रविवार, १५ एप्रिल, २०१२

आयुष्यावर बोलू कांही




Add caption

आयुष्यावर बोलू  कांही

संगीतकार व गायक डॉक्टर सलील कुलकर्णी आणि कविवर्य संदीप खरे ह्यांचा झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रम  "आयुष्यावर बोलू कांही" पाहत व ऐकत असताना मला वाटले हे आयुष्यावर जे बोलत आहेत ते बहुतांशी काव्यात, आणि ते स्वाभाविक होते कारण एक गायक  तर दुसरा गीतकार . दोघांच्या जीवनाचा मुलभूत आधार,उद्दिष्ट,प्रचार हेच मूळी संगीत आहे. मनात क्षणिक विचार आला  आपण सुद्धा असे कांहीतरी करून पहावे, पण काव्य क्षेत्रातील आपली गुणवत्ता लक्षात घेता लक्षात आले कि नाही this is not my cup of tea . काव्य, गायन, संगीत ह्यांची आवड असणे आणि ते अंगीत असणे ह्यात जमीन आस्मानचा फरक आहे. पण गद्यात म्हटले तर वाटले शक्य आहे, कारण लेखन प्रांतात अश्यातच बर्या पैकी अनुभव आला आहे, कांही असो, रंगमंचावर उभे राहून हे सर्व प्रस्तुत करण्याचे धाडस आता राहिले नाही. मग  काय ठरले कि आयुष्यावर लिहू कांही, घेतली लेखणीची परवानगी आणि सुरु  झालीलेखनाची इफ्तीदा                         

 "आयुष्यावर लिहू कांही"  

 मला वाटते बोलणे व लिहिणे ह्यातील तफावत नाटक आणि चित्रपटा ह्यातील तफावती सारखे आहे एक जिवंत,तर  दुसरे रिटेक घेण्याची मुभा असलेले, दुरुस्ती करण्याची संधी असलेले. एक रेकॉर्ड तर दुसरे document .

आयुष्य  व जीवन ह्यात काय फरक आहे,  माझ्या मते  आयुष्य  
जगण्याचा मार्ग म्हणजे जीवन, एक पथिक व एक पथ. आयुष्य, जीवन प्रालब्ध नशीब रुणांबंध हे शब्द जरी समानार्थी नसले तरी एक मेकांशी येव्हढे निगडीत आहेत कि त्याना निराळे करणे मुश्कीलच नाही तर नामुमकीन आहे. एका विषयी लिहिताना दुसरा त्याचां हात धरून आपोआपच प्रगट होतो.

आयुष्य म्हणजे आजच्या काव्याप्रमाणे चुलीवरच्या कढईतले कांदे पोहे, का जुन्या काव्याप्रमाणे तव्यावरची भाकर ? कांही असो दोहोनाही चटके खाणे अनिवार्य  आहें.

आयुष्य म्हणजे काटेरी रस्ते का गुलाबाच्या फुलांची पायवाट ? मला वाटते आयुष्य म्हणजे गुलाबा सोबत काटे सुद्धा, कारण काटे नसतील तर गुलाबाची किंमत समजणे कठीण. कोण्या शायराने म्हटले आहें ना 'न मिलता गम तो बरबादी के अफसाने कंहा जाते, अगर दुनिया चमन होती तो वीराने कंहा जाते. '

आयुष्य  म्हणजे सुखाच्या दुधाला दुखाच्या विर्जणाने लावलेले आंबट गोड दही ,का दोन्हीचे स्थायी भाव टिकवून झालेली नवीन निर्मिती?

आयुष्य म्हणजे मंजुळ  गोड पाण्याचा झरा का गढूळं   पाण्याची खोल विहीर ? उत्तुंग उंच पर्वत का खोल खोल भयानक दरी, पाण्याचा बुडबुडा  का आकर्षक कारंजे ?

आयुष्य म्हणजे लोणावळा खंडाळा घाटातील चढाव उताराचे नागमोडी रस्ते का नव्याने झालेला पुणे मुंबई एक्ष्प्रेस्स हायवे  ?
का
ग दि मा ने म्हटल्याप्रमाणे सुख दुखांच्या धाग्याने विणलेले वस्त्र ? ज्या वस्त्राचा मध्यभाग दुखांच्या धाग्याने विणला गेलाय आणि ज्याची किनार सुखाच्या धाग्याने.  अर्थात सगळ्यांचे   वस्त्र सारख्याच धाग्याने विणलेले नसते हे सत्य आहे.

मला वाटते आयुष्य म्हणजे निरनिराळ्या पदार्थाने भरलेले जेवणाचे ताट.
एक एक पदार्थ म्हणजे एक एक भोग, नशिबाचा वाटा. कांही गोड  सुखद  कांही आळणी तिखट दुखद. कोणाच्या ताटात काय वाढले  असेल ह्याचा अंदाज नाही पण जे वाढले गेले ते गोड मानून, चवीने खाऊन पचवण्याची शक्ती ज्याला  प्राप्त झाली,  त्याला आयुष्य जगण्याची युक्ती गावली असे म्हणण्यास हरकत  नाही.

आयुष्याला चंदनाच्या खोडाची उपमा सुद्धा देतात , जे स्वता: झिजत जाते पण शेवट पर्यंत सुगंध देत राहते, पण सगळ्यांची आयुष्य चंदनासारखी नसतात, अगदी बोटावर मोजण्या सारख्या माणसांच्या आयुष्याला हि उपमा सजते, जे फार उच्च आचार विचाराचे असतात.
आयुष्य म्हणजे लोण्याचा गोळा तर नाही, जो चटके खात वितळतो, पण तुपासाराख्या एक सुगंधी, स्वादिष्ट, शुध्द व अत्यंत उपयुक्त पदार्थाची निर्मिती करतो. जसे  मानवाचे आयुष्य संपले तरी वारस रुपात तो एक निर्मिती समाज घटने साठी मागे सोडतो. अर्थात हे तूप कधी कधी करपलेले पण असू शकते.


आयुष्य ही खूप मोठी उल्झन आहे . अगदी जन्म मरणासारखी गूढ रहस्यमयी . सुखवस्तू लोकांपेक्षा गरीब किंवा पांढरपेशी लोकाना आयुष्याचा खरा अर्थ लवकर आणि नीट समजतो , कारण प्रत्येक उजेडणारा नवीन दिवस हा त्यांच्या करीता समस्यांनी भरलेल्या प्रश्न  पत्रिके सारखा असतो, आणि त्याच्यावर  मात करण्यासाठी थोडी पूर्व तयारी करावी लागते . शब्दात समजावणे कठीण, पण ह्याला म्हणतात जिसने जिंदगी नजदिकसे देखी हैं उसे जिंदगीका मतलब समझ मे आता हैं, भले मतलब कांही असो. 

मी वर म्हटल्या प्रमाणे आयुष्य एक मोठे रहस्य आहे, उद्या काय होईल ह्याची पुसटशी सुद्धा कल्पना नसते, राजाचा रंक होवू शकतो किंवा रंकाचा राव  सुद्धा, असल्याचे नसणे  होवू शकते, ज्याला आपण नशीब, प्रालब्ध, विधिलिखित अश्या अनेक सौन्द्न्या देवून सामोरे जातो. त्यासाठी" कल क्या होगा किसको पता अब जिंदगीका लेलो मजा" असे म्हणून प्रत्येक क्षण जगला पाहिजे आनंदाने हसत                                LIVE LIFE KING SIZE 

कोणास वाटते  जीवन म्हणजे दुखाची खोल दरी, जेथे जगणे किंवा मरणे कोणाच्या हातात नाही, तर कोणास वाटते जीवन हा एक खूप सुखद प्रवास आहे. माणसाच्या दोन जाती आहेत एक सकारत्मक विचार करणार्यांची ज्याना खुश मिजाज म्हणता येईल  व दुसरी नकारत्मक विचार धारणीची, ज्याना सुखातही दु:ख शोधण्याची सवय  असते व ते कधीच आनंदी राहू शकत नाहीत. ज्याचे त्याचे प्राक्तन .

'जिंदगी  के सफर में गुजर जाते है जो मकां वो फिर नही आते', 'आने वाला पल जानेवाला है', 'गुजरा हुआ जमाना आता नही दोबारा हाफिज खुदा तुम्हारा ' ह्या सर्व पंक्ती काय सुचवतात कि प्रत्येक क्षण मोलाचा आहे, गेली घडी ना यायची तेंव्हा प्रत्येक क्षण जगा जगा आणि जगा, ते पण स्वता: साठी नाही तर सर्वांसाठी.

आपने लिये जिये तो क्या जिये तू जी ऐ दिल जमाने के लिये.

आयुष्य कंठण्या साठी किंवा जीवन जगण्या साठी माणसाला कसला तरी आधार म्हणा किंवा बहाणा लागतो. बहाणा खुबसुरत असेल तर जगणे पण हसीन वाटते, इतके सुंदर कि म्हणावे वाटते                        The life is worth living twice 
 आणि जगण्याचा हेतू केवळ जीवन आहे म्हणून जगावयाचे तर मग म्हणावयाची पाळी येते                  OH GOD 

कोणाला कला तर कोणाला क्रीडा कोणाला संगीत  तर कोणाला काव्य लेखन, कोणाला संसार तर कोणाला पर्यटन अश्या एक नाही तर अनेक कारणास्तव माणसाला जगण्याची प्रेरणा मिळते. आणि मग येतील त्या समस्यांना सामोरे जावून जो आपले उद्दिष्ट साधतो तो म्हणवला जातो जो जिता वोही सिकंदर

आयुष्या पासून माणसाच्या खूप अपेक्षा असतात, कधी त्या पूर्ण होतात तर कधी अपूर्ण रहातात.  सफलतेचे माणूस जश्न मनवतो, आणि यशाबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेतो . पण अपयशा बद्दल परिस्थितीला किंवा परमेश्वराला जबाबदार ठरवतो , हे योग्य नाही. परिस्थितीवर मात करणे हा तर खरा आयुष्याचा लढा.

एकदा लिहिण्यास बसले कि विचाराना बांध घालणे कठीण जाते, अलीकडे माझ्या लेखणीने  बरीच विस्तारित  प्रवास वर्णने लिहिण्याची जोखीम पार पाडली. वर्णने वाचून आमचे चिरंजीव म्हणाले, बाबा प्रत्येक इनिंगला शतक मारलेच पाहिजे असे नाही, कधीतरी अर्ध शतक मारून दुसर्या फलंदाजाला मौका द्या. तारीफ करण्याचा एक निराळाच अंदाज...........  म्हटले मान्य! कदाचित माझा वाचक वर्गच  हे मला सूचित करत असेल. वास्तविकता हा विषय एव्हढा गहन आहे कि, ह्या इनिंगला एक नाही चांगली दोन शतके मारू शकतो, पण नको, इथेच इनिंग DECLARE .

रविवार, ८ एप्रिल, २०१२

जन्नत ए कश्मीर

आमच्या सफरीचा श्री गणेश: वास्तविकता : कोजागिरीला आग्रा येथील ताज दर्शनाने व्हावयाचा होता , पण तेलंगाना आंदोलन समितीला हे मंजूर नसावे, कारण आम्ही ज्या दिवशी प्रयाणास निघणार होतो त्याच्या दोन दिवस आधी पासून ह्या समितीने रेल रोको ची घोषणा केली.  तत्परतेने आम्ही प्रवासाची तारीख अलीकडे  घेवून,   तत्काल मध्ये तिकीटाची व्यवस्था करून,   दगडावर दगड घालून,    show must go on    ह्या नार्या नुसार प्रवासास सुरुवात केली . नागपूर मार्गे प्रवास आणि आमच्या काका काकूंची भेट नाही हे अश्यक . आमच्या तेरा जणांच्या टीम साठी काकूने आणलेल्या पुरणाच्या पोळ्या व मसाले वडे म्हणजे त्यांच्या  पाक कौशल्याचा एक उत्तम नमुना म्हणता येईल. असे कांही प्रसंग नक्कीच डोळ्यात आनंदाश्रू दाटवतात. दिल्ली स्टेशन बाहेर मोहन ह्या टूर संचालकाने जेव्हा रिंकू driver न आल्याचे सांगितले तेव्हा सगळेच खट्टू झाले. जितु ह्या driver सोबत परिचय झाला,    जीत अच्छे व्यवहारसे सबका मन जीत लो , असे मी त्याला म्हणालो.   इतर प्रवाश्यान विषयी मला माहित नाही,   पण मदतीसाठी कायम तत्पर असलेल्या त्याच्या  स्वभाव गुणाने आमच्या परिवाराचे मन निसंशय जिंकले.  पोटचा मुलगा काय करील एव्हढी त्यांनी मदत केली,  प्रशंसा केल्या वाचून रहाववत नाही.  हरिद्वार , बृन्दावन, मथुरा अशी देवस्थाने  करत सफरीस  देवदर्शनानेच सुरुवात झाली  (आखिर वो ही होता हैं जो मंजुरे  खुदा होता हैं) . ठरल्या प्रमाणे कोजागिरी पौर्णिमेला मात्र  आग्रा गाठले. त्या आधी..................  बृन्दावनला पहाटे चार वाजता एका बंगाली आश्रमात येवून पोहोंचलो, तेव्हढ्या पहाटे कोठे रहाण्याची व्यवस्था होणे अवघड होते, म्हणून हा आश्रमाचा मिळालेला आश्रय बुडत्याला काडीचा  आधार म्हटल्या प्रमाणे आधारास आला. प्रातविधी आटोपून जवळच असलेल्या मंदिराकडे धाव  घेतली. सुरेश भूमकर , ह्या माझ्या मित्राच्या स्वभावाचा आणखी एक वाखाणान्या लायक  पैलू मला अनुभवायास मिळाला. विद्याच्या सहायासाठी गणेश होता, पण  सुरेशने पटकन पुढे होवून माझ्या व्हील चेअरचा ताबा घेतला. तेव्हढ्या मोठ्या प्रांगणात त्याने मला फिरवलेच, पण तेथून पुढील पूर्ण प्रवासात  त्याने मलाच नाही तर विद्या व श्वेताला जी मदत केली  त्याची स्तुती शब्दात करणे अशक्य. त्याच्या स्वभावाचा हा पैलू इतके दिवस माझ्या पासून तरी दडून होता.       बृन्दावन दर्शन घेतले व दुपारच्या उन्हात मथुरेस श्री कृष्ण जन्मस्थान बघण्यास निघालो.  केवढा विरोधाभास, कृष्ण जन्म मध्यरात्री मुसळधार पावसातला व आम्ही ऎन दुपारी भर उन्हात तेथे होतो. मंदिर भव्य दिव्य व स्वच्छ आहें, सर्व तीर्थक्षेत्री असतात तशी येथेही अन्नछत्र आकर्षक वस्तूंची दुकाने इत्यादी आहेत.

                                                                  बृन्दावन प्रवेशद्वार
                                                            तेरे जैसा यार कंहा
एक किस्सा मी नमूद करण्यास विसरलो. आमच्या आतापर्यंत च्या प्रवासात गाण्याच्या भेंड्यांची खुमासदार महेफील रंगली होती.  स्त्री वर्ग vs पुरुष वर्ग अश्या टीम्स होत्या. सौ शुभांगीताई गद्रे ह्यांच्या मराठी गाण्यांच्या ठेव्यातून त्या ज्या पद्धतीने एक एक गाण्यांची गोलंदाजी करत होत्या, त्यावरून मला आपण सा , रे, ग, म, प च्या मंचावर तर नाही ना असे वाटत होते.  आमच्या प्रत्येक हिंदी गाण्याच्या अन्ताक्षराला त्यांच्या मराठी आद्याक्षराने जवाब मिळत होता. दोन्ही बाजू मजबूत होत्या, त्यामुळे नतीजा अनिर्णितच राहिला. ह्या कार्यक्रमाचे पुन: प्रक्षेपण व्हावे असे खूप वाटत होते पण ते घडले नाही ह्याची खंत तर वाटतेच,  पण ते न होण्या मागची घटना...........उत्सुकुता ताणून शेवटी.  "एक शहेन्शाहने बन्वाके हंसी ताजमहल, सारी दुनियाको मोहब्बत की निशानी दि हैं " शकील बदायुनी ह्यांच्या कलमेतून उतरलेली लीडर चित्रपटातील ही प्रेमाची गाथा , चित्रपट ऐतिहासिक नाही, पण शायरीचे बोल आपल्याला नक्कीच मोघल साम्राज्याच्या काळात घेवून जातात.  वास्तविकता मोघल साम्राज्यात सगळ्यात जास्त गाजली,  ती सलीम आणि अनारकलीची प्रेमकहाणी.   शहेनषः शहाजान च्या गहार्या प्रेमापेक्षा,  त्या प्रेमाच्या  पायावर उभी केलेली ताजमहल ही  कलाकृतीच  मात्र इतकी प्रसिद्ध झाली की जगातील सातव्या आश्चर्यात त्याची  गणना होते.  चवदाव्या बाळंत पणात दिवंगत झालेल्या आपल्या प्रिय मुमताज बेगमच्या आठवणीत ,   आपल्या आयुष्याची   २२ वर्षे गुंतवून,   करोडो रुपये खर्च करून, २०००० मजूर कामाला जुम्प्वून बेगमच्या प्रेमाला दिलेली ही अविस्मरणीय पावती, कदाचित तिला जन्नत मध्ये  सुखी ठेवण्यात कामास आली असेल.  असे सांगण्यात येते की ताजमहाल ही कलाकृती पूर्ण झाल्यावर शाहजानने   त्या मजुरांचे हात तर कापलेच पण त्यांचे डोळे पण काढून घेतले ..... कारण अशी कलाकृती पुन्हा त्यांच्या कडून घडू नये व ती त्यांना  पाहाता  पण येवू नये.   ह्या क्रूर कृत्याकडे कोणीही एक भयंकर कृत्य, एक अक्षम्य गुन्हा, किंवा एक घोर पाप म्हणूनच बघणार.  पण नाण्याला दोन बाजू असतात, आपण जर नाण्याची दुसरी बाजू पाह्यली तर आपल्याला शहाजाहा च्या  निस्सीम प्रेमाची खोली लक्षात येईल. क्षणेक पण मी त्याच्या कृत्याचे समर्थन करत नाही आहें, पण स्वतःला त्याच्या जागी ठेवून विचार केला एवढेच. विचार हे स्वपानासारखे असतात, ज्याला कसल्याच  मर्यादा नसतात , सहज मनात विचार आला एव्हढेच . भगवान के घर देर हैं  अंधेर नही , त्यांनी केलेल्या पापाचे माप त्याला त्याच जन्मी भरावे लागले. त्याच्या वृद्धा अवस्थेत त्याच्या मुलाने म्हणजेच औरंगजेब ने त्याला त्याच्या हयातीत बंदिवासात टाकून साम्राज्य स्वतःकडे घेतले.    मी मोघल साम्राज्याचा इतिहास लिहित नाही आहें, पण सहज त्या काळातील घटनांकडे पाहिले व लक्षात आले की ह्या प्रत्येक बादशहाचे कश्या न कश्यावर प्रेम होते, अकबरचे धर्म सहीष्णूतेवर,  त्याने जोद्दन्बाई ह्या राजपूत स्त्रीशी विवाह तर केलाच, पण तिला हिंदू धर्माप्रमाणे पूजा अर्चनेची परवानगी पण दिली. एक गोष्टीचा मात्र उलगडा होत नाही,  तो म्हणजे त्याचा सलीम-अनारकलीच्या प्रेमावर घेतलेला आक्षेप,    कारण ती केवळ एक  कनिज होती ?  बाबरचे आपला मुलगा हुमायून ह्याच्यावर असलेले प्रेम हुमायून आजारी असताना , बाबरने अल्लाकडे आपले प्राण घेऊन मुलाला वाचवण्याची केलेली इबादत.   औरंगजेब ह्याचे इस्लामवर असलेले प्रेम, त्याने इतर धर्मीय लोकांवर केलेले अत्याचार , ह्याची ग्वाही देतात. बहादूर शाह जफर ह्याचे शायरी वरचे प्रेम. " न किसीकी आंख का नूर हुं, न किसीके दिल का करार हुं , जो किसीसे के काम न आ सके मै वो एक मुश्तेगुबार हुं " ही त्याची नज्म आज पण आपल्याला ऐकावयास मिळते, व आवडते,  जिंदगी जवळून पाहिलेल्याला ह्याचा खरा अर्थ खर्या अर्थाने कळतो. तर अश्या ह्या मोघलांच्या आग्रा ह्या पाक भूमीवर यमुना तीरी  असलेल्या ताज महालच्या प्रांगणात आमच्या लग्नाचा ३३ वा वर्धापदिन आणि माझा ६२ वा वाढदिवस परीण्य्स गेस्ट हौस मध्ये अत्यंत प्रसन्न वातावरणात, पौर्णिमेच्या चांदण्यात , मित्र आप्तेष्टांच्या सोबतीत व खुमासदार जेवणाचां स्वाद घेत साजरा झाला. आम्ही उतरलेल्या गेस्ट हौसच्या  मालकाने फुलांचा बुके , तसेच टेम्पोच्या driver ने आणलेला केक आणि लास्ट बट नौट लिस्ट म्हणजे  सौ लड्डा व सौ गोंदिकर (पूर्वाश्रमीची देऊकुळे) ह्यांनी विद्याला केलेला गेट अप , खास लक्षात रहाण्या सारखे होते.

                                       विद्या पंडित लग्नाच्या ३३ व्या वर्धाप्दिनी आग्रा येथे

                                                           ताजमहालचे प्रवेशद्वार

पौर्णिमेच्या रात्री चांदण्यात न्हाहलेला ताज पहाण्याची मजा कांही औरच. पिकते तिथे विकत नाही म्हणतात ना,  तसे मला त्या रात्री भासले कारण, तेथे  भारतीयान पेक्षा परदेसी प्रवासीच  जास्त दिसले. तेवढ्या रात्री हजारो प्रवासी त्या कलाकृतीचे मनसोक्त दर्शन घेत होते.  मला मात्र ताजच्या सोबत "जो वादा किया वो निभाना पडेगा, रोके जमाना चाहे रोके खुदाई हमको आना पडेगा" असे गुणगुणत हातात हात घालून फिरणारे शाहजहान व मुमताज बेगम चालत असलेल्याचा भास झाला. खरे तर बाहेर पडण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण रात्रीच्या दर्शनास वेळेचे बंधन असल्याने बाहेर पडावेच लागले. दिवस भराच्या सुखद घटनानचा आढावा घेत निद्राधीन झालो. सकाळी कांही मंडळी पुन्हा ताज दर्शनास पळाली, कांहीनी आराम केला.  साधारण ११ च्या सुमारास, न्याहारी उरकून आम्ही फतेहपुर च्या दिशेने धाव घेतली. मोघलांचा, विशेषता अकबर कालीन घडामोडींचा आढावा घ्यावयाचा बाकी होता.   आग्र्या पासून सुमारे ३० किलो मीटर वर असलेले फतेहपुर सिक्री हे प्रेक्षणीय स्थान बघण्याची उत्सुकता वाढत होती.  फतेहपुर व सिक्री अशी ही दोन निराळी गावे होती, जी अकबराने एकत्र जोडली. फतेहपुर ही अत्यंत भव्य लाल रंगाची इमारत  कलाकृतीचा उत्तम नमुना तर आहेच पण घ्या इमारतीच्या आवारात असलेली मोहम्मद सलीम  चिस्ती ह्यांची संगेमरमरने बांधलेली कबर आकर्षणीय तर आहेच पण इबादत च्या दृष्टीने खास महत्वाची आहें. शहेनशा अकबर ह्याला तीन बेगम असूनही लग्नानंतर तेवीस वर्षांपर्यंत अपत्य नव्हते. अकबरने अजमेर दर्ग्या पासून फतेहपुर पर्यंत अनवाणी व उघड्या डोक्याने पायी प्रवास करून चिस्ती साहेबांची सेवा केली, ज्याच्या फलस्वरूप जोद्दन्बाई कडून त्याला जहांगीर ह्या पुत्राची प्राप्ती झाली. जहांगीर ह्याचे दुसरे नाव सलीम का , ह्याचा उलगडा येथे होतो. ह्या कबरीच्या भिंतीना असलेल्या जाळीला रेशमी धागा बांधण्याची येथे प्रथा आहें ज्या योगे तुमची मनोकामना पूर्ण होते असा लोकांचा विश्वास आहें. फतेहपुर ह्या इमारतीचा बुलंद दरवाजा हा भारतातील ऐतिहासिक वास्तूंच्या दरवाजातील सगळ्यात उंच दरवाजा आहें.  ह्या आवाराताच एक भव्य मस्जिद आहें. ह्याच्या दुसर्या आवारात अकबराचा नवरत्न दरबार, दीवाणे आम आणि दीवाणे खास ह्या वास्तू आहेत.  जयपूर हा पुढील टप्पा, आम्हाला वेळे अभावी बायपास करावा लागला. राजस्थान मध्ये पुलाला पुली म्हणतात, पुढील मार्गासाठी कोणाला विचारणा केली की, थोडी आगे पुली हैं , वहांसे बांये मोडो , उसके बाद बायपास लेना ,असे बहुतेक लोक सांगत, त्यामुळे पुढील प्रवासात पुली व बायपास  हे दोन शब्द एवढे सरावाचे झाले की आम्ही प्रवासी एक मेकात हे शब्द गमतीने वापरू लागलो. नुकतीच प्रवासास सुरुवात झाली होती, रात्र थोडी  व सोंगे फार अशी स्थिती होती (आमच्या सफरीचे एकूण दिवस कमी पण प्रेक्षणीय स्थळे खूप होती) बहुतेक प्रवासी साठीच्या वर्गातील असलेल्याने रात्रीचा प्रवास टाळणे आवश्यक होते, व कोठेतरी बायपास करणे जरुरीचे होते, तसेच चांगलासा थांबा पण. इस्लाम धर्माचा अनादर न करता, अजमेरच्या दर्ग्याला बाहेरून सलाम करून पुष्कर च्या दिशेने गाडी वळवली. रस्ता दुरुस्तीमुळे गाडीला गती घेता येत नव्हती, तरीही शक्य असेल तिथे गती घेवून रात्री ९ चे सुमारास, पुष्कर येथील क्रिश प्यालेस ह्या हॉटेलात दाखील झालो.  छोटेसे गाव असूनही सोय बर्यापैकी होती. सकाळी 'पुष्कर' सरोवरात स्नानास जाण्यासाठी निघालो, हॉटेल पासून तसे सरोवर जवळ होते, पण टेम्पो पण रात्रीच्या विश्रांती नंतर आमच्या सेवेसाठी  तत्पर होती. पुष्करच्या परिसरात पुजार्यांच्या सोबत अनेक माकडांनी आमचे स्वागत केले. ह्या पंड्यांशी कसे बोलावयाचे ह्याचा सराव असलेल्या माणसांनी काय ते योगदान ठरवले. स्नान करून तीर्थक्षेत्री होणार्या विधी उरकून ब्रम्हाच्या दर्शनास ब्रम्हा मंदिराच्या दिशेने दोन पायाच्या वाहनाने जाण्यास सुरुवात केली. पुष्करवर विधी करताना पंड्याने गोत्र विचारले, मी वसिष्ट गोत्राचे उच्चारण केले, सुरेशने पण तेच उच्चारण केले, मी म्हटले अरे तुझे गोत्र तू उच्चार, तो म्हणाला माझे गोत्र, वशिष्ट आहें,  गम्मत म्हणजे पंड्याचे  गोत्र पण वशिष्ट च होते गम्मत म्हणून सांगावेसे वाटले.  संपूर्ण भारतात ब्रम्हाचे एकच मंदिर आहें,   ते का आणि कसे ह्याच्या विषयी दुमत आहें, तेव्हा ते आता सांगून वाचकाना संभ्रमात न टाकणे बरे.  पुष्कर ते उदयपुर खूप दूरचा पल्ला तर होताच पण मार्ग ही रुक्ष,   हिरवळ तर औशधालाच, संगेमरमरचे डोंगर आणि त्याच्या वस्तूंची दुकाने  मात्र मार्गावर टप्या टप्यावर दिसत होती.  उदयपूरला पोहंचे पर्यंत संध्याकाळ होत आली, त्यामुळे हॉटेलवर न जाता, होतील तेव्हढी स्थळे बघून घेण्याचे ठरले. श्री हनुमंत गद्रे इथे नुकतेच येवून गेले असल्याने त्याना इथली बरीच माहिती असल्याचे दिसले.  विजेच्या झगमटात  उदयपूरचे  सरोवर  खूप दर्शनीय वाटले,  हैदराबाद च्या ट्यांक बंड व लुम्बिनी पार्कचे combination असल्या सारखे मला वाटले,  नजारा दर्शनीय होता त्यामुळे पटकन त्याला कॅमेर्यात टिपण्याचे काम गणेशने अचूक पणे केली.  बर्याच वर्षांनी चना चोर गरम खायला मिळाले, त्याचा स्वाद घेत राणा प्रताप उद्यानाला भेट दिली, नंतर सखीयोन्की बाडी ह्या आगळ्या पद्धतीचे  शॉपिंग सेनटर पाहून आधीच आरक्षित केलेल्या हॉटेल वर भोजन  व विश्रांतीसाठी गेलो. राजस्थानी थाटात सजलेले ते हॉटेल जरी महागडे असले तरी बरे वाटले, एक तर तकिया लोडला टेकून दिवाणावर बसून बाम्बुन्च्या शेड मध्ये मंद उजेडात स्वादिष्ट जेवणाची मजा आगळीच होती, आणि दुसरे म्हणजे तेथून दिसणारा उदयपुर प्यालेस  चा अद्वितीय नजारा वाह क्या बात.   माझी मानलेली  बहिण निमाताईची  मुलगी व जावई येथे असतात,    दुसरे दिवशी सकाळी ते उभयता आम्हाला भेटण्यास हॉटेलवर आले, व येताना आमच्यासाठी तेथील स्पेशल गरम जिलेबी आणण्यास विसरले नाहीत. बरे वाटले, आजच्या धावत्या युगात जेथे रक्ताची नाती सुद्धा , नाती दाखवताना कचरतात त्या युगात जोडलेल्या नात्याची जाणीव ठेवणे विशेष वाटले. चहापाणी झाले व  नंतर आम्ही उदयपूरच्या प्यालेस बघावयास बाहेर पडलो.    उदयपुर palace एक अप्रतिम राजवाडा  /वस्तू संग्रहालय म्हणा ना. ' राजस्थान ' कलाकुसरी साठी प्रसिद्ध असलेल्या ह्या प्रांतात वसलेला हा राजवाडा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. प्रवेश द्वारात स्वागतास व मदतीस असलेले राजस्थानी वेशातले दारोगाजी,  विदेशी पर्यटक, गाईड सगळे बघत राजवाड्याच्या प्रांगणात आलो.  तल्लख व विनोदबुद्धी  गाइड ने प्रथम उदयपूरच्या  सर्व सविस्तर इतिहास विषयक घटनांची माहिती सांगितली आणि मग आम्हाला वास्तू बघण्यास घेवून गेला. त्या राजवाड्याच्या पांच मंजीली चढणे आम्हा उभयताना शक्य नव्हते व त्यामुळे कदाचित आमच्या सह प्रवाश्याना  विलंब होण्याची दाट संभावना होती, म्हणून आम्ही मागेच राहून परिसरातील बाग, राजस्थानी पेहराव घालून  फोटो काढणे, कलाकुसरी च्या वस्तूंची असंख्य दुकाने पाहण्याची मजा मनसोक्त लुटलीच,   शिवाय दोन मजल्या पर्यंत चढून राजवाडाही पाहाण्याचे नेत्र सुख पण,   तसेच कुणाला  विलंब न करता.  श्री लड्डा ने विद्याला राजवाड्याच्या पायर्या उतरण्यास केलेली मदत नमूद करावीशी वाटते.                             जवळच असलेले  शंकराचे  मंदिर पाहून अम्रीत्सर्च्या दिशेने प्रस्थान केले.   हैदराबाद आंध्र प्रदेशहून निघून, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, युनियन teriotery , उत्तर आंचल, व राजस्थान पार केल्यावर आमचे डोळे सुजलाम सुफलाम आणि  माझा अत्यंत आवडता, पंजाब कडे लागले. म्हणतात ना "जो मजा इंतेजार मे हैं , वो दिदारे यार मे  नही", तसे कांहीसे आमचे झाले. उदयपुर ते अम्रीत्सर खूप लांबचा पल्ला होता, त्याशिवाय रस्ता दुरुस्ती गतिरोधक बनले. रात्री ८ वाजले तरी आम्ही अजून राजस्थानच्या परिसरातच होतो त्यामुळे दिदारे पंजाब त्या दिवशी होणे शक्य नव्हते आणि इंतेजार करणे जरुरी होते, तसेच विश्रांती करीता थांबा घेणे आवश्यक होते. फार पुढे जाण्यात तथ्य नव्हते, एक तर निर्मनुष्य रस्ता, तो ही खडतर व प्रवासी पण अगदी नौजवान ! राजस्थानच्या सीमेत असल्याने संगम रवराने आमची साथ सोडली नव्हती.  'मकराणा  मार्बल सिटी' ह्या छोट्या टाऊन मधील कोहिनूर प्यालेस  ह्या मार्बलने सजवलेल्या हॉटेलचा रात्री साठी सहारा घेतला. कोहिनूर नावावरून मालकाचा धर्म लक्षात आला, पण चविष्ट शाकाहारी जेवण तर मिळालेच व मेहमान नवाजी पण तारीफे काबील , हॉटेल व्यवस्थापकाला दुसरे दिवशी खुदा हाफिज म्हणताना ओठावर शुक्रिया हे शब्द सहजपणे आले.  माकराना मार्बल सिटी, नाव भारदस्त व छान वाटले,   मार्बल सिटीचा मार्बल मागे पडत होता, लवलवत्या पात्यांची हिरवीगार  शेते,    क्यारीयोमे बेहता नेहर का पानी,   आपल्या लाडक्या जगजीत नाहीतर मनजित कौरला क्यारिअर्वर बसवून पुत्तर पर्मितेला दांडीवर घेवून  सायकलवरून जाणारे सरदारजी, पंजाब जवळ आल्याची चाहूल देत होते. रस्त्यात परांठे, लस्सी इत्यादी  वस्तू पोटात रिचवत रात्री ८ चे सुमारास अम्रीत्सरला पोहोंचलो. इथे आल्यावर  वाटले की, जो मजा इंतेजार मे था, उतनाही दिदारे पंजाब मे हैं ,केव्हा एकदा सुवर्ण मंदिरात जातो असे झाले होते,   थांब्या साठी कोठल्या हॉटेल वर जावे ह्याची चर्चा करण्यात थोडा वेळ अनर्थक गेला, शेवटी   एका नवीन व आधुनिक होटलचा ताबा घेतला. सामान रूम मध्ये पटकले,  फ्रेश झालो, व मंदिराकडे धाव घेतली.  मी, विद्या,गणेश,सुरेश व श्वेता अशी आमची व्हील चेअर वाली टीम कासवा प्रमाणे मागे होती, बाकी सश्यांची टीम पुढे दौड मारत गेली, पण तेच झाले जे कासव आणि सश्याच्या बाबतीत. आम्हाला ग्रंथ साहिबाचे दर्शन मिळाले, पण दुसर्या टीमला फक्त मंदिराचा परिसर. मला ह्याचा आनंद झाला असे मी म्हणत नाही,   सहजच ससा आणि कासवाच्या गोष्टीची आठवण झाली इतकेच.  देवळाचे विशाल आवार, स्वच्छ तलाव, अखंड कार सेवा करणारे असंख्य पंजाबी, अगदी लहान बालकापासून ते शंभरीचे म्हातारे, पाहून खूप नवल वाटले ,   आम्हाला पण थोडी सेवा केल्यावाचून पुढे जाणे जमले नाही.'लंगर' शीख लोकांचे, शब्दात बयान न करता येण्या सारखे सेवा भावेने ओतप्रोत असे अन्नछत्र, कोठेही  देणगीची मागणी नाही सगळीकडे स्वच्छता, शांतता व भक्तीने ओथंबलेल्या धुंद वातावरणात कानावर पडणारे' "शबदचे" सुरेल स्वर, पावलानाना जागीच खिळून ठेवतात ,  की पुत्तर म्हणून मदतीचा हात पुढे करणारे सरदारजी पाहून मन भरून आले. लन्गरचा लाभ घेवून, हॉटेलवर परतलो. दुसर्या दिवशी सूर्यप्रकाशात सुवर्णमंदिराचे सौंदर्य बघण्यास गेलो.   रात्री दिव्यांच्या रोशनाइत झगमगणारे तलावाच्या पाण्यात प्रतिबिंबित सुवर्ण मंदिर जेवढे आकर्षक वाटले, तेवढेच सूर्यप्रकाशात पण ते तेजस्वी व नेत्रदीपक भासले. प्रसाद रुपात दिलेला साजूक तुपात भिजलेलां हलवा दोन तीन वेळा ग्रहण करून, आवारात निवांत पणे मंदिराचा परिसर परीक्षण करत मनोमन शीख धर्मीय लोकांचे स्वधर्म प्रेम, त्यासाठी घेतलेली मेहनत व धडपड ह्याचे कौतुक करत लंगरवर पोहोंचलो.  दिवस रात्र चालणार्या ह्या लंगरचे प्लानिंग कसे करत असतील, कोठे गोंधळ नाही, गडबड नाही, कसली कमतरता नाही, खरेच वाहे गुरुंची कृपा आहें. माझा तरी पाय तिथून   निघत नव्हता, पुन्हा इथे येण्याचा निश्चय करूनच तेथून बाहेर पडलो. त्याग्याचे प्रतिक, देशासाठी प्राण अर्पण करण्यास सज्ज असलेल्या ह्या अम्रीत्सर मध्ये इंग्रजाने केलेला  भीषण  अत्याचाराचे  निशाण   जालियानवाला बाग बघून त्या प्रसंगाचे चित्र डोळ्यासमोर दिसू लागले र्हदय हादरल्या  सारखे झाले.  किती निष्पाप लोकांच्या प्राणाची आहुती इथे दिली गेली, त्या घटनेला शतक होत आले, पण त्या वास्तूत फिरताना मन भरकटून जाते, पण................? शेवटी ह्या गोष्टीना undo करता येत नाही हे कटू सत्य पचनी पाडावे लागते. वाघा बोर्डर, सफरीतले पुढचे स्थान, ह्या स्थानाला मी प्रेक्षणीय स्थळ कधीच  म्हणणार नाही, भले ते प्रवेशद्वार, तो परिसर, तिथली ती परेड बघण्या लायक असेल, पण तिथे कोठल्या प्रकारचे पावित्र्य नक्कीच नाही. असंख्य लोकांच्या प्राणांची आहुती देऊन मिळवलेल्या स्वतंत्र भारताचे हिंदुस्थान व पाकिस्तान असे दोन भाग केलेले दोन देश, एकाच धरतीचे दोन भाग, व गेट पासून केवळ २० किलो मीटरवरचे लाहोर ज्याने आमच्या हिंदी  चित्रपट सृष्टीला  असंख्य  कलाकार, निर्माते दिले ते  पाकीस्थानात, आणि गेटच्या ह्या बाजूस हिंदुस्थान. असो जशी माणा विलेजला नेपाल बोर्डर पाहिली, रोहतंग पासला चीनची बोर्डर पाहिली तशी इथे पाकिस्तानची , म्हणजे अजून एक दुसर्या देशाची बोर्डर पाहिल्याचे समाधान मिळाले इतकेच.  ' चलो बुलावां आया हैं, माता ने बुलाया हैं ' माता वैष्णोदेवीच्या  बुलाव्याने गाडीने कत्राचां मार्ग सिधाराला. घाट रोड, आजूबाजूचे नैसर्गिक सौंदर्य बघून केदार यात्रेची आठवण झाली. गाणी,भजने गुणगुणत, देवीचे स्मरण करत, रात्री १० चे बेतास कटरा गाठले. नेहमीच्या सरावाने रहाण्याची सोय केली, चविष्ट जेवण घेतले, व दर्शनाच्या चौकशीस सुरुवात केली, कोणी, डोलीची, कोणी helicopter ची, कोणी एन्ट्री तिकीटाची जुळवाजुळव करण्यास बाहेर पडली. अनेक निरनिराळे प्लान्स आखले, रात्री १ चे सुमारास सर्व ट्रेक चढण्यास सज्ज झाले, पण दुर्दैवाने प्रवेश पर्चीची वेळ टळून गेली होती, सकाळी लवकर उठून पुन्हा सर्व दर्शनाच्या तयारीस लागले, helicopter मिळण्याची शक्यता नव्हती. आम्ही सर्व आटो करून ट्रेक वे कडे  धाव घेतली. मा का बुलावा आला नव्हता , वर जाण्याचे कोठलेही  साधन उपलब्ध नव्हते, त्यामुळे खालूनच देवीला वंदून जड अंतकरणाने पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले, देवीपूजा झाली नाही तरी पोटपूजा करणे जरुरी होते, उतारवयातील अलंकार (बी पी , शुगर) बहुतेकांकडे होते व त्याच्या निर्मुलना साठी पोटपूजा. 
 'हर चेहरा यहा चांद तो हर जर्रा सितारा, ये वादिये कश्मीर हैं जन्नत का नजारा' १९६० ते १९७० हिंदी रंगीत  चित्रपटाचा सुवर्णकाळ , ह्या काळातील अनेक चित्रपटातून पाहिलेले जन्नते कश्मीर प्रत्यक्ष पाहण्याचे वर्षानुवर्षे उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण होण्याची  वेळ आली होती. मा वैष्णोदेवीच्या न झालेल्या दर्शनाने निराश झालेल्या मनाने पुन्हा कश्मीर दर्शनाच्या आशेने उभारी धरली. घाट रोड , सौंदर्य सृष्टी  टिपत श्रीनगर च्या दाल लेक  सीमेवर केव्हा पोहोंचलो कळालेच नाही. टेम्पोतून उतरलो, दृष्टिगोचरात  दुसर्या किनार्यावर फक्त एका पेक्षा एक सुंदर हौस बोट्स दिसत होत्या. रस्त्याच्या उजव्या बाजूस आधुनिक हॉटेल्स.   इक्बाल, ज्या हौस बोटच्या मालकांनी आमच्यासाठी बोट्स आरक्षित केल्या होत्या, तो आमचे स्वागत करण्यास अदबीने उभा होता. टिपिकल काश्मिरी उर्दूत संभाषण करत त्याने त्याच्या साहायाकान सोबत आम्ही व आमचे सामान उतरवून दोन शिकार्यामध्ये बसवले व आम्ही हौसबोट कडे सियाहीमध्ये  (अंधार) जाण्यास  सुरुवात केली, आम्ही शिकार्यात बसलो व वीज गेली. आम्ही हौस बोटीत पाउल ठेवले व पाठोपाठ विजेने, त्यामुळे प्रथम दर्शनी बोटीच्या नजार्याचा  आनंद द्विगुणीत झाला. थोड्या दडपणाखालीच तेथे प्रवेश केला, कारण बर्याच जणांनी बोटीवर रहाणे कसे धोकेदायक ह्याचे वर्णन केले होते, पण आम्ही अनुभवलेला ३ दिवसांचा स्टे म्हणजे एक अत्यंत सुंदर आणि अविस्मरणीय , पुन्हा अनुभवा असा अनुभव होता. इक्बाल व त्याच्या सार्या कुटुंबीयाने केलेली चोख सोय एकदम दिलखुश करणारी. 'जब जब फुल खिले' ह्या चित्रपटात हौस बोटचे भरपूर चित्रीकरण होते, पण त्याचा उपभोग घेतल्या शिवाय त्याची मजा समजत नही.  प्रत्येक सोयीनी युक्त अश्या ३ बेड रूम + ड्राइंग +डाइनिंग असलेल्या त्या बोटीवर मिळणारे भोजन इतके अप्रतिम होते की, क्या कहने.  उद्या काय करावयाचे , हे विचारून नाश्ता व जेवण तयार केले जायचे , काश्मिरी पलाव, सोजी व सुक्या मेव्याचां हलवा, तसेच कोखा हा काश्मिरी चहा हे तर मिळालेच पण आश्चर्य म्हणजे कांदे पोहे व उपमा पण त्याने देऊ केला .
 रात्री हौस बोट मध्ये थोडेसे टेन्स व थोडे कुतुहूल मिश्रीत भावनेने झोपेचा सहारा घेतला, टेन्स अश्यासाठी कि अनेकांनी मनात भरवलेली भीती, व कुतूहल असे कि, जल लहरींवर राहायाची ही पहेलीच वेळ, त्यात ते लाकडी सुंदर सुबक घर. दुसरे दिवशी सकाळी निवांत उठलो, नाश्ता केला ,उबदार कपडे घालून तयार झालो, व इक्बाल च्या सांगण्या नुसार दाल लेकची सफर करण्यास सुंदरश्या शिकार्यात बसलो, दाल लेक मधील तीन तासांची सैर म्हणजे अद्वितीय , चहूकडे  पाणी, समोर नजर पोहन्चेल तिथपर्यंत नीले पर्बतों  की धारा, लेक मध्ये चोहीकडे शिकार्यातून फिरणारे पर्यटक त्यांच्या खिदमतीत शिकार्यातून आकर्षक वस्तू विकत फिरणारे  विक्रेते, काश्मिरी ड्रेस घालून फोटो काढण्यासाठी गळ घालणारे फोटोग्राफर, फळे  व इतर खाद्य पदार्थ घेऊन ग्राहकास खाण्यास उत्सुक करणारी मुले, सगळे कसे आगळे वेगळे होते. तब्बल तीन तास दाल लेकची सफर करून लेक मधीलच साड्या व कपड्यांच्या दुकानात शॉपिंग साठी गेलो, बर्याच जणांनी विंडो शोपिंगच केले, अस्मादिक मात्र कनुकू सिल्कच्या ११ साड्या, अर्ध्या तासात घेऊन मोकळा . दाल लेकची सैर संपवून, शंकरचार्यांच्या   देवळास जाण्यास निघालो, २२० पायर्या असलेले हे देऊळ, ऐक शांततेचे चिन्ह आहे. चिनार व देवदार वृक्ष्यांचा परिसरात वळणा वळणाच्या रस्त्याने देवळा पर्यंत पोहचण्याचा मार्ग आल्हादायक भासला. श्रीनगर मध्ये फिरताना प्रत्येक ठिकाणी कोठल्या न कोठल्या चित्रपटाचे चित्रण झाल्याचे गाईड सांगत होते , त्यामुळे कल्पनेने आम्ही त्या त्या नायक नायीकाना गाणी गात फिरताना बघत होतो. गम्मत वाटली. देवदर्शनानंतर उरलेल्या  सबंध दिवसात  निरनिराळ्या गार्डन्स बघण्याचा बेत होता.  शालीमार , मोघल जन्नत अश्या निरनिराळ्या गार्डन्स बघेस्तोवर संध्याकाळ झाली . गार्डन्स जरी एकापेक्षा एक असल्या तरी , कश्मीर मध्ये कांही वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांचे पडसाद आजही बघावयास मिळतात , कोठेतरी ही स्थाने दयनीय वाटतात, ह्या सुंदर बगीच्यांच्या  जोपासनेत नक्कीच कमतरता असल्याचे जाणवते.  विशेषता शालीमार ही जहांगीर  बादशाहाने बांधलेली गार्डन फारच दुखी, विस्कटलेली, , निराशजनक व मुर्झाइसी वाटते. ज्या गुलाबाचे ताटवे चिनार, देवदार  वृक्षांची मेजवानी हिंदी चित्रपटातून अनुभवली  आहे, ती प्रत्यक्षात तेवढी आढळली नाहीत, पर्यटक आहेत, पण त्यांची गर्दी नाही, फर्लांगा फर्लांगावर असलेले आर्मीचे जवान जरी सुरक्षेतेतीची जाणीव  देत असले तरी केव्हा कांहीही होऊ शकते अश्या विचारांचे दडपण मनावर क्षणेक का होईना येते हे सत्य नाकारता येत नाही.   पण कांही म्हटले तरी जन्नत ए कश्मीर जिवनात एकदा तरी अनुभवावे हे खरे. गुलमर्ग, सोनमर्ग, पहेलगाम नावे उच्चारायला  सुद्धा किती छान वाटते, अश्या ह्या गुलमर्गला गुलाबी थंडीत, निसर्ग रम्य वातावरणात कोठे टेकडीवर , कोठे झाडीत तर कोठे प्लेन रस्त्यावर तीन तास घुड सवारी  म्हणजे आयुष्यातली  एक गोड व अविस्मरणीय घटना म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. घोड्यांच्या चालकांनी आम्हाला मिशन कश्मीर चित्रपटाचे चित्रीकरण झाले त्या स्पॉट वर नेऊन स्व खर्चाने चहा पाजला, चहा पीता पीता त्यांच्यांची झालेल्या गप्पांच्या ओघात एक दर्दनिय सत्य समोर आले, ते असे की जेव्हा कश्मीर मध्ये दंगे फसाज चालले होते, तेव्हा पर्यटकांच्या अभावी ह्या लोकांची कशी उपासमार झाली, किती कुटुंबे उध्वस्त झाली, व ज्यामुळे त्या समाजातील युवक कसे वाईट कामे करण्यास प्रवृत्त झाले, सर्वच करुणास्पद होते. आज परिस्थिती बदललेली आहें, ह्या लोकाना पुन्हा कामे मिळत आहेत, प्रवाशांकडून छोट्या छोट्या इनामाची ते अपेक्षा करत असतील,  तर त्यात मला तरी कांही गैर वाटले नाही, शेवटी माणुसकीची जाण ठेवून  आपण मुठ थोडी मोकळी केली तर समाजात होणार्या कुकर्माना आळा घालण्यात आपण कांही तरी केल्याची जाणीव नक्कीच समाधान देईल. गुलमर्ग दृष्टीत भरून परतताना सफरचंदाच्या बागा पाहिल्या, एरव्ही आपण ठेल्यावर विकावयास आलेली सफरचंद घेतो, पण इथे ताजी ताजी झाडावरची सफरचंदे तोडून खाण्याची मजा कांही आगळीच, हस्तकलेच्या दुकानात काश्मिरी पेहराव घेतला, सुक्या मेव्याच्या दुकानात आक्रोड, बदाम इत्यादीची खरेदी झाली, सुका मेवा आपल्याकडे पण मिळतो, पण इथून आणलेल्या मेव्याची चव न्यारीच.  संध्याकाळी ७ चे सुमारास दाल लेकच्या किनार्यावर पोहोंचलो, एक टीम हौस बोटकडे वळाली, आमची संथ गती टीम कलाकुसरींच्या वस्तू खरेदी करीता मागे रेंगाळली. बोटीवर गेलो तर खास काश्मिरी मेनू जेवणाच्या टेबलावर आमची आतुरतेने वाट पहात होता, आम्ही पटकन फ्रेश होऊन त्या मेनूला न्याय दिला. आज बोटीवरची शेवटची रात्र असल्याने, जरा जास्तच वेळ गप्पा मारल्या, बोटीत उगीचच इकडे तिकडे फिरलो व मग निद्राधिस्त झालो.  दुसरे दिवशी सकाळी ९ चे बेतास तयार होऊन कांदे पोह्याचा नाश्ता, कश्मीरी चहाची चव घेतली व ओलसर डोळ्यांच्या कडांनी इक्बाल परिवार आणि त्या मूक हौस बोटचा निरोप घेतला, सामान व आम्हाला शिकार्यात बसवून पैल तीरावर सोडण्यास इक्बाल आला, कांही चूक भूल झाली असल्यास क्षमेची याचना केली व पुन्हा येण्याचे मनपूर्वक आमंत्रण देऊन नवीन  प्रवाश्यांच्या अतिथ्यासाठी शिकार्यात बसून  हौस बोट्कडे वळला. आम्ही टेंपोत आपापल्या सीटचा चार्ज  घेतला. खूप दूरचा पल्ला गाठावयाचा होता गाडी गती घेत होती, श्रीनगर मागे पडत होते, मन गेल्या १५ दिवसातील घटनांचा आढावा घेत होते. सुखद क्षण चेहर्यावर हसू आणत होते, कांही ज्या छोट्या  अप्रिय घटना झाल्या त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न अर्थक असूनही मन गप्प बसत नव्हते. विनोदबुद्धीने सगळ्याना सतत हसत ठेवण्याचा सुरेशचा यत्न नक्कीच वातावरण प्रसन्न करत होते, लड्डा सुद्धा त्यांच्या परीने साथ देत होते. अनंतनाग ह्या भागातून फिरताना मैलो न मैल रस्त्याच्या कडेलां पसरलेली केशराची शेती आयुष्यात प्रथमच पाहिली, ती ही शेतात उतरून , तेथील ताज्या केशराच्या डब्या घेण्यास कोणीच चुकले नाही, जरी   फुले तोडणे हा गुन्हा आहें ,   तरी एक दोन फुले संग्रही ठेवण्यासाठी तोडण्याचा  गुन्हा केल्यावाचून राहाववले नाही.  श्रीनगर ते जम्मू २४० किलो मीटर्सचा पूर्ण रस्ता  घाटातून व नागमोडी वळणांचा आहें , गाडी अत्यंत मंद गतीने जात होती,आणि तश्यातच घाटात एक अपघात झाल्याने पुढील मार्ग तात्पुरता बंद झाला होता, रस्ता मोकळा होण्यास किती वेळ लागेल ह्याची कल्पना नव्हती, रात्रीच्या जेवणाची वेळ होत आली , यक्ष प्रश्न होता पण उत्तर नव्हते . आसपास तीन तासानंतर रहदारीला सुरुवात झाली, घाट उतरताच एक अलिशान पंजाबी धाबा नजरेस पडला, पोटात इंधन घालणे अत्यंत आवश्यक होते, धाब्याची सजावट  जेव्हढी  चांगली होती  तेव्हढीच सर्विस पण आणि जेवण सुद्धा, देर से संही पण सगळ्यांनी यत्छेच भोजन केले. दिल्ली अजून फार दूर होती व मर्जीविरुद्ध सुद्धा रात्रीचा प्रवास करणे अत्यावशक होते, नाहीतर दुसर्या दिवशी दिल्ली गाठणे मुश्कील होते. diver सोबत आळीपाळीने सुरेश, मी व लड्डा जागे होतो, बाकी प्रवाश्याना तरी झोप मिळावी हा सुउद्देश. जीतूची खरेच शर्थ होती, जल्लंधर, पठाणकोट, लुधियाना, पटियाला अशी पंजाब मधील एक एक स्थाने पार करण्यात निशांत झाला. प्रात: विधी, स्नान इत्यादी साठी अम्बाला येथे  हॉटेल मध्ये उतरलो. रात्री ८ ला दिल्लीहून हैदराबाद ची  फ्लाईट असल्याने ७ पर्यंत विमान तळावर असणे जरुरी  होते. अजूनही २०० किलो मीटर्स ची  दुरी पार करावयाची  होती. रस्ता दुरुस्तीने आमची पाठ सोडली नव्हती, चलते चलते कुरुक्षेत्राचे धावते दर्शन घेऊन, सात वाजता विमानतळ गाठले. कांही प्रवाश्यांसाठी विमान प्रवासाचा हा पहिलाच अनुभव असल्याने अपेक्षित विलंब कन्फ्युजन झाले, पण सरते शेवटी सर्व व्यवस्थित पणे बोर्ड झाले, ठराविक  वेळेस विमानाने उड्डाण घेतली व षडूल वेळेवर शमशाबाद विमान तळावर ल्यांड केले. श्रीनगर पासून दिल्ली विमान तळा पर्यंतच्या प्रवासाने थकलेले प्रवासी केवळ  दोन तासात  दिल्ली हैदराबाद प्रवास संपल्याने खुश व उल्हासित झाले, एकमेकांचे निरोप घेवून सर्वांनी आपापल्या घराचा मार्ग पत्करला.  ह्या प्रवासातील एक विशेषता म्हणजे सौ देऊकुळे , सुरेश व मी १९५४ ते १९५९ साला पर्यंत असलेले वर्ग मित्र एकत्र आलो, ह्याला कपिला शस्ठीचा योगच म्हटले पाहिजे.  प्रवासात निवडक प्रवाश्यांच्या क्षुल्लक कारणास्तव घडलेल्या कांही अप्रिय घटनांमुळे  सफरीतील गमती जमतीला जरी  गालबोट  लागले, तरी एकंदर  सफर यशस्वी झाली. आज ह्याला दोन महिने होत आले, ह्या अप्रिय घटनां मागच्या कारणाचे विश्लेषण करता , मला आजही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही,  पण एक गाण्याचे बोलं मात्र मला भेडसावतात                              " कळेना  अजुनी माझे मला असा मी काय गुन्हा केला"     असो-        'never give up ' ह्या तत्वानुसार पुढील, म्हणजे  नेपाळं ट्रीपच्या तयारीस मी लागलो आहें          आमच्या ह्या आगामी सफरीत येवू इच्छुक सभासदांचे                                                                                                                                                                    हार्दिक  स्वागत                


बुधवार, ४ एप्रिल, २०१२

मा का बुलावा - पशुपतीनाथ , नेपाळ आणि सांगता


                                इंदिरा गांधी इंटर न्याशनल विमान अड्डा, दिल्ली   

 सकाळी ९ वाजता आम्हाला इंदिरा गांधी इंटर न्याशनल विमान अडडयावर सोडून, रविवारी दुपारी आम्हाला पिक अप करण्याचे प्रॉमिस करून जितु गेला. सगळे अगदी वेळेवर, सुरक्षित, व्यवस्थितीत चालले होते, आम्ही चेक इन साठी आत गेलो. विद्या वगळल्यास सगळ्यांचे पासपोर्ट किंवा इलेक्शन आय डी कार्ड्स होते, तिला बोर्डिंग पास मिळेल का नाही या विषयी शंका होती. तिला जर पास मिळाला नाही तर गणेश, मी व श्वेता ह्यांनी  मागे रहावयाचे असे मी आधीच ठरविले होती, तसे मी जाहीर पण केले, पण विद्या नाही तर कोणीही जाणार नाही असे काका, साठे व सुरेशही म्हणाला, मनाचा केव्हढा मोठेपणा!!!! असे कांही होणार नाही असा माझ्या  मनाचा कौल होता, पण धागधुग होतीच. तिचा  फोटो सहित मेडिकल दाखला होता, पण त्या आधारावर तिला बोर्डिंग पास नाकारला गेला. क्षणेक सगळे नाराज झाले, ओळख पत्र नसताना बुकिंग का गेले असा सरळ प्रश्न विद्याने मला विचारला, ती वेळ रागावण्याची किंवा डोक्यात राख घालण्याची नव्हती,  तर शांत चित्ताने पर्यायी उपाय शोधण्याची होती. माझ्या पासपोर्ट वर स्पौस (बायको) म्हणून विद्याचे नाव होते, व मेडिकल दाखल्यावर तिचा फोटो होता ह्या आधारावर कांही होऊ शकेल का, प्रयत्न करण्यास काय हरकत आहें असा विचार मी काकूंकडे व्यतीत केला, सुरेश व त्या पुन्हा ते दोन आधार घेवून चौकशीस गेल्या. अश्या वेळेस कोणी मनोबल वाढवले तर बरे वाटते, साठे काकुनी विद्याला एक मंत्र म्हणावयास सांगून, काम होईल असा धीर दिला. पशुपतीनाथ प्रसन्न झाले, इंडिगोच्या हेडने खूप ब्रॉड व्ह्यू घेतला व अवघ्या पांच मिनिटात विद्याला बोर्डिंग पास मिळाला, आम्ही बरेच आधी रिपोर्ट केल्याने हे सगळे करण्यास वेळ मिळाला. हे सगळे सविस्तर लिहिण्याचे कारण म्हणजे असे प्रसंग कोणावर येवू नयेत, पण आलेच तर काय करू शकतो हे समजावे इतकेच.  आम्ही सगळे व्यवास्थितीत बोर्ड झालो, विमानाने उड्डाण घेतली, ठरलेल्या वेळेस काठमांडूला ल्यांड केले, आकाशात आम्ही फार वेळ नसलो तरी भारताची सीमा पार करून आम्ही दुसर्या देशात गेलो होतो. विमान तळावर हॉटेल सिल्व्हर होम ने पिक अप गाडी पाठवली होती.
                                                                               काठमांडू
हॉटेलच्या रस्त्यास लागलो, गाड्यांच्या प्लेट, दुकाने व घरांवरील नंबर चक्क मराठी अंकात , सगळे फलक देवनागरी लिपीत नेपाली भाषेत लिहिलेले  नेपाली भाषा ,बरीच बंगालीशी मिळती जुळती असल्याने मला तरी समजण्यास सोपी वाटली व त्यामुळे तेथील लोकांशी बोलणे पण जमले.  रस्त्यातील वाहनांचे नियमा विरुद्ध जाणे, रस्त्यांची हालत, आपल्या ओरिसा  बिहार किंवा यु. पी. सारखे दाळीद्र  पाहून आपण भारता बाहेर आहोत अस वाटले नाही.  विमान तळा पासून हॉटेल बर्यापैके दूर होते, सिल्वर होम, थ्यामल प्लेस, पत्यावरून हॉटेल विषयी अपेक्षा जास्त होत्या, पण नाव मोठे, लक्षण खोटे असे कांहीसे हॉटेल पाहून वाटले. परदेशात रहाण्याची सोय होती, हे ही नसे थोडके, असे म्हणून हॉटेलचा आसरा घेतला. आमचे आरक्षण ज्या हॉटेल मध्ये होते, तेथे उतरलेल्या विदेशी पर्यटकांचे विमान डीले झाल्याने रूम्स रिकाम्या झाल्या नव्हत्या, म्हणून आम्हाला बाजूच्या हॉटेल मध्ये अकामोडेत केले होते. थंडी मी म्हणत असल्याने कोठे बाहेर पडावे वाटत नव्हते, चहापाणी, जेवण सगळे रूमवर मागवले, माझी कढी पातळ झाली असल्याने, मी अंथरुणातून बाहेर पडलो नाही. विद्या व मी सोडून सगळे संध्याकाळी बाहेर छोटी चक्कर मारून आले.  नेपाळ मध्ये विजेची टंचाई असल्याने, चौवीस तासांपैके दहा तास वीज कपात असते, तरी रात्री वीज असते हे बरे, सोलार सिस्टीम असल्याने, गरम पाण्याचा प्रश्न नव्हता, पाण्याचा रंग लालसर. हॉटेल वरचे जेवण खास नव्हते, पण कोपर्यावर एका बाईचे हॉटेल/जेवणावळ होती, तेथे जेवण छान मिळत होते, दहीभात तर बहोत खूब, राघुकाका तर त्या जेवणावर खूप खुश होते. काका आणि  सुरेश मिळून दुसर्या दिवशी नेपाळ दर्शनाची व्यवस्था फायनल करून आले.

दुसरे दिवशी सकाळी फ्रेश वाटलं, आठ वाजता आम्ही सर्वप्रथम, येथील प्राचीन बौध मंदिर बघण्यास गाडीत बसलो, वीस सिटरची  गाडी  एकदम नवीन व झाक  होती, गाडीचा साडेचार फुटी driver  दिनेश एकदम हसमुख  होता. बौध मंदिराला दीडशे पायर्या असल्याने, दुरून दंडवत केले. आता पशुपतीनाथ मंदिराकडे गाडीची  चाके वळवली. प्रवेशद्वारा पासून एक कि.मी. दूर गाडी थांबवून  इसके आगे पैदल जाना पडेगा असे फर्मान दिनेशने काढले, माझा सेवक गणेश  खाली उतरला, पोलिसाला आमच्या काठ्या दाखवून विनंती केली, हवालदार ने त्याच्या विनंतीस मान  दिला, व गाडी पुढे गेली, थोडे पुढे गेल्यावर पुना रुकावट, आता तर पायर्या होत्या, गाडी जाणे शक्य नव्हते. उपाध्यय  नावाचा  एक पंड्या समोर आला, तो म्हणाला, यहांसे भी आपको काफी चलना पडेगा  मी वास्तविक तयार होतो, कारण देव दर्शन म्हटले कि थोडे टाकीचे घाव सोसावायास हवेत, पण विद्या म्याडम ची केस पेशल आहें, गाडी अगदी गाभार्यात नेता आली तरी तिला हवी असते. पांड्याने  गाडी उलटी घेण्यास सांगितले, आमच्या कडून अभिषेक, दक्षणा ह्याची त्याला अपेक्षा  असावी  असे मला वाटले. कांही असो  आम्हाला प्रवेशद्वारा पर्यंत त्याने गाडीने नेलेच, शिवाय व्हील चेअरचा पण इंतेजाम केला, मलाच  शर्मिन्दगी वाटली  पशुपतीनाथ  बहुतेक आमच्या दर्शनास उत्सुक असावेत. आमच्या disability चा एक फायदा होतो, दर्शन व्यवास्थितीत, लवकर होते, आमचेच नाही तर सोबतच्या यात्रीकांचे सुद्धा,  दुखा:त सुख मानावयाचे. पशुपतीनाथ मंदिर बरेच  प्राचीन आहें, येथील पितळ्याचा  नंदी प्रचंड मोठ्ठा आहें, महादेव,  मूर्ती रुपात आहेत आम्ही  सगळ्यांनी रुद्राभिषेक केला , नेपाळी असला तरी पंड्या देखणा होता, त्याचे मंत्र पठण पण स्पष्ट, व श्रवणीय होते. अभिषेकानंतर प्रसाद रुपात त्याने आमच्या गळ्यात चोपन रुद्राक्षांची माळ        घातली,  आमचे १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन संपन्न झाले, छान वाटले. 
                                  रुद्राभिषेका नंतर पशुपतीनाथ मंदिर द्वारात
अयोध्येपासून इथपर्यंत वानरसेनेनी  आमची साथ सोडली नव्हाती .
                                                 वानरसेना सभासद
आम्ही प्रसन्न चित्ताने  बाहेर पडलो, जेवण उरकले  आणि पुढील पागोडा  मंदिराला गेलो. पागोडा ही इमारत  बांधणीची एक पद्धत आहें ती कशी हे सांगता येणार नाही पण त्याचे फोटो पाहून नक्कीच   कल्पना येईल.
                                                       पागोडा बांधणी
 इधर क्या हैं  असे दिनेशला विचारल्यावर सुबे  देखा ना वैशा शेम टू शेम बुद्ध मंदिर हैं, असे त्याने टिपिकल नेपाळी टोन मध्ये सांगितले. नेहमीप्रमाणे आम्ही उभयता गाडीत पार्किंग मध्ये आणि बाकी सारे मंदिरात. आमच्या  असे गाडीत बसण्याने driver सोबत संवाद साधता येतो, त्यामुळे तेथील स्थानाविषयी माहिती मिळतेच  पण त्याच्या खाजगी बाबी पण समजतात. रघुकाकाना ह्यांडसम ही उपाधी त्यांनी दिली होती, तसेच मला म्हणाला आप का पांव ठिक होता तो आप और एक शादी करने को मंगता, मी त्याला सांगितले आम्ही एक पत्नी ,एक वचनी, एक बाणी श्रीरामाच्या धरतीचे पुत्र आहोत, पाय ठिक असता तरी और एक शादी रचली नसती असो_  बावीस वर्षाचा हा बुटका दिनेश, कला नावाच्या एका मुलीच्या  प्रेमात पडला होता, कलाचे त्याला सारखे  फोन येत होते, आपण किती बिझी आहोत व कसे भेटू शकत नाही, हे तो तिला सांगत होता , घरचा विरोध असल्याने दोन महिन्या नंतर तो तिला पळवून आणणार  होता. मी कल्पनेने त्याचे ते कलाला पळवून आणणे व मंदिरात जावून लग्न करण्याचा सीन पाहिला, त्याची ही प्रेमगाथा संपेस्तोवर आमची ग्यांग परत आली. आणिक कोठे न जाता आम्ही हॉटेल कडे वळलो,  हॉटेल  जवळच हस्त कलेच्या  वस्तूंची अनेक दुकाने होती,    एखाद दुसर्या वस्तूची खरेदी सोडल्यास बाकी विंडो शौपिंगच केले.

दुसरे दिवशी आठच्या ठोक्याला दिनेश आला, आज भक्तपूर पहावयाचे होते,  नेपाळ मध्ये  लोकशाही अमलात येण्या आधी, भक्तपूर ही नेपाळच्या बादशहाची  राजधानी होती .  येथे राजाचा  पागोडा पद्धतीचा राजवाडा तर आहेच, पण दशभुजा गणपती, महालक्ष्मी, नरसिंह स्वामी इत्यादी देवतांच्या मूर्ती आहेत. देशात कोठेही पौराणिक किंवा ऐतिहासिक स्थानास भेट दिली कि गाईड तेथील स्थानाच्या महत्वा पेक्षा, तेथे कोठल्या चित्रपटाचे चित्रीकरण झाले हे प्रामुख्याने सांगतात, तसेच भक्तपुरला सुधा देव आनंद च्या "हरे रामा हरे कृष्णा" ह्या गाजलेल्या चित्रपटाचे ते गोविंदाच्या "घरवाली बाहेरवाली" पर्यंत झालेल्या चित्रिकरणा विषयी सांगण्यात आले.  भक्तपूर तसे थ्यामल प्लेस पासून बरेच दूर होते, आम्हाला ११ पर्यंत एअर पोर्ट गाठावयाचे होते, त्यामुळे मध्ये एकदा फक्त चहा साठी  थांबून सरळ त्रिभुवन इंटर न्याशनल एअर पोर्ट, काठमांडू गाठले, सर्व सोपस्कार व्यवस्थित पार पडले, विमानाने वेळेवर उड्डाण घेतली,व दीड तासात  आम्ही  दिल्ली गाठली.  जितु पिक अप करावयास आला होता, गाडीने  फारीदाबादचा मार्ग सिधाराला.
                                                          भक्तपूर येथे काका सोबत श्वेता  
                                            नेपाळी वस्तूंचे दुकान ,भक्तपूर  
आमच्या नौ जणांची टीम पुन्हा फरीदाबादला पोंचली, संध्या आमोदने पुन्हा पहिल्याच उत्साहाने आमचे स्वागत केले, चेहर्यावर एकही शिकन नाही. लग्नात वरपक्षाची ठेवावी तशी आमची बडदास्त ह्या उभयतांनी ठेवली, गाद्या गिरद्या, खाणे , चहापाणी, आहेर कशाची कमतरता नाही, तो दिवस संकष्टी चतुर्थीचा होता, केतकराना तीन मेहुणांचा मान करण्याचा मौका मिळाला, आणि आम्हाला जेवणा सोबत विडा दक्षणेचा लाभ. आमच्या टीम तर्फे आम्ही त्याना नेपाळहून आणलेला पितळ्याचा  सुबक गणपती दिला, गम्मत म्हणजे, संध्या म्हणाली कि, त्यांच्याकडे गणपती विकत घेण्याची प्रथा नाही, पण कोणी दिला तर त्याचे मन:पूर्वक स्वागत असते, बरे वाटले. असलेल्या एक दिवसाच्या वास्तव्यात संध्याच्या पाक कलेचे  बरेच व उत्कृष्ट  नमुने आम्हाला चाखावयास मिळाले.
                                              घरेलू अवतारात आमोद सोबत 
                                                      संध्या व श्वेता क्या पक रहा है
त्यांच्या मेहमान नवाजीचे कौतुक करावे तेव्हढे कमी आहें. त्यांचे घर प्रचंड मोठे तर आहेच पण सुंदर सजावटीचा एक उत्तम नमुना सुद्धा आहे, पण त्याहून अधिक मोठे व सुंदर आहें ते त्या उभयतांचे  विशाल र्हदय.  दुसर्या दिवशी जेवण खाण झाल्यावर, दोन चे सुमारास आम्ही निघालो, सिल्व्हर फ़ौइल  मध्ये प्याक करुन्र रात्रीच्या जेवणाची तरतूद देण्यास संध्या  विसरली नाही. निघताना तिच्या डोळ्यात अश्रू दाटले, ते पाहून आमचेही डोळे पाणावले. पाणावलेल्या डोळ्यानीच आम्ही तिचा निरोप घेतला, गाडी दिल्ली स्टेशन कडे निघाली, मन गेल्या पंधरा दिवसांचा आढावा घेण्यात रमले. पार्किंग पासुन चार नम्बरच्या फलाटावर आम्ही दोघे सामानाच्या ठेल्यावर बसुन आलो, ह्या यात्रेची विशेषता म्हणजे रोपवे पासून हवाई जहाज, आणि डोली पासून ठेल्या पर्यन्त वाहनाच्या सर्व साधनांचा आम्ही उपभोग घेतला. दिल्ली स्टेशन वर आमच्या सुनबाईची आई आम्हाला भेटण्यास आली, येताना आम्हा सर्वांसाठी मिनी बेकरीच बरोबर घेवुन आल्या, त्यानी आणलेल्या, कुकीज, चौकलेटस  अजून आम्हाला पुरवठ्यास येत आहेत. सकाळी आकराचे सुमारास जोशी व साठे दाम्पत्य नागपूरला उतरले, आमचा उरलेल्या पांच जणांचा प्रवास   हैदराबाद च्या दिशेने सुरु झाला, दिवसा ट्रेनचा प्रवास थोडा कंटाळवाणा असतो, पण आमच्या बरोबर एक तेलुगु लहान कुटुंब होते त्यांची अडीच वर्षांची छकुली दीप्ती, इतकी लाघवी व हुशार होती कि तिच्याशी बोलण्यात वेळ मजेत गेला. संध्याकाळी साडेसातला Secunderabad  आले,  मुलांनी क्याब बुक केली होती, सुरेशची सून गाडी घेवून त्याला घेण्यास आली होती, जेवणाचे वेळे पर्यंत सर्व घरी सुखरूप पोहोंचलो.
                                             आमची प्यारी सहेली टेम्पो
                                   आमच्या सखीचा सखा वाहन चालक जीतू
आमच्या सर्वांची सखी, आमची टेम्पो, आणि तिचा प्रियकर (वाहन चालक) जितु ह्यांच्या  सहकार्या शिवाय आमची हि यात्रा एव्हढी सुखद व सुरक्षित  झाली नसती, तेव्हा त्यांचे आभार मानले पाहिजेत. तसेच नूरजहान,सुरैया,लता, आशा,गीता,सुमन,शमशाद ह्या गायिका आणि सैगल,मन्ना,रफी,मुकेश,तलत, हेमंत व किशोरदा हे गायक आमच्या पसंती नुसार गाऊन आमची करमणूक करण्यास चोवीस तास सी.डी रुपात आमच्या सोबत असल्याने आमची यात्रा सुखदच नाही, तर संगीतमय झाली,त्याबद्दल सिनेसृष्टीला  सुद्धा मन:पूर्वक सलाम. संगीता शिवाय जीवन म्हणजे मिठा शिवाय जेवण.

आमच्या सुनबाई गझल व चिरंजीव सनी ह्यांनी  घर सांभाळण्याची जबाबदारी पत्करून आम्हाला यात्रेस पाठवले तेव्हा आमच्या सफल यात्रेच्या श्रेयात त्यांचा सुद्धा हिस्सा आहे
हे विसरून चालणार नाही.

नेपाळला गरिबी लाचारी मुळे , फसवणूक होते, शासकीय अस्थिरते मुळे तेथे केंव्हा कांहीही होऊ शकते असे आम्हाला सांगण्यात आले होते. हवामान ठिक नसेल तर वैष्णोदेवीला हेलीकॉप उड्डाण घेत नाही, हेलीप्याड पासून तीन किलो मीटर चालावे लागते, काठमांडूला जाण्यास पासपोर्ट किंवा इलेक्शन आय. डी. असणे जरुरी आहें (जी विद्या कडे नव्हती) तसेच कडाक्याच्या थंडीशी सामना अश्या बर्याचश्या समस्यां बद्दल आम्हाला निरनिराळ्या लोकांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने सावध केले होते,  अर्थातच  हे सगळे  आमच्या भल्या करिताच.    पण " आम्ही सारे एक असू, एकमेका सहाय्य करू " ही टीमची सद भावना व अन्तकरणाच्या खोलीपासून तसेच भक्तीने ओतप्रोत केलेल्या आमच्या यात्रेचे संपूर्ण दिवस आमच्यावर येव्हढे मेहरबान होते कि,  कोणाला, कोठेही, कसलाही,कशाचाही त्रास झाला नाही, कांही समस्या  आल्याच तरी,   त्या चुटकी सरशी सुटल्या .  योजना केलेली सर्व स्थाने तर बघितलीच, शिवाय   'आनंद साहिब' हे शिखांचे गुरुद्वार व 'भाकरा नांगल' धरणाचे ओझरते दर्शन,  हे बोनस गुण  पण आमच्या खाती जमा झाले. यात्रा निर्विघ्न पार पडली, त्यासाठी विघ्नहर्त्या विनायका सोबत सर्व देवतांचे चरणी नम्र अभिवादन आणि सह यात्रिक व शुभेछकांस शत शत धन्यवाद.
                                              जय माता दी
माता वैष्णोदेवी मार्ग

मंगळवार, ३ एप्रिल, २०१२

मा का बुलावा - चंदिगढ, कुरुक्षेत्र

                                                  राक गार्डन, चंदिगढ
रौक गार्डन , बेस्ट औट ऑफ वेस्ट हा नेम चंद ह्या एका इसमाने केलेल्या निर्मितीचा उत्तम नमुना. गार्डन म्हटले कि आपल्या डोळ्यांपुढे दिसते ते निरनिराळ्या  फुलांची फुलझाडे, एखादे कारंजे, लहान मुलांच्या खेळण्या करीता झोके, घसरगुंड्या  इत्यादी, पण येथे तसे कांही नाही, जुन्या ड्रमसने बांधलेली कॉम्पौंड वाल, टाईल्स च्या तुटक्या तुकड्याने, एलेक्ट्रीकल सिरामिक स्वीच  चे तुटके अंश ह्याने सजवलेल्या भिंती, बसण्याचे चौक, एकावर एक माठ रचून केलेली पडदा वजा भिंत , कपारी, मोठ्या गोटयान सारख्या दगडाने बांधलेली,अरुंद कृत्रिम वेडीवाकडी दरी, त्यातून वहाणारे पाणी, थोडे चक्रव्यूह सारखे रस्ते, सगळेच और आहे. शब्दात सांगणे मुश्कील, हे अनुभवलेच पाहिजे, तर त्याची मजा. आम्ही अगदी लवकर तेथे गेल्याने, गर्दी नव्हती व आम्हाला सगळे निवांत, मनसोक्त पाहता आले, त्यात  हलक्या गुलाबी थंडीमुळे आणिक मजा आली. 
                                    तू तेथे मी ,काका काकू राक गार्डन मध्ये
                                                              कपार
                                               माठांची पडदा वजा भिंत  
                                         टाईल्स च्या तुकड्यांची भिंत
रोज   गार्डन,  विविध गुलाबांच्या ताटव्याने सजलेली, कारंज्याने नटलेली , आधीच सुंदर असलेल्या चंदिगढच्या सौंदर्याला चार चांद लावते  ही गार्डन रात्री विजेच्या झगमटात    पाहण्याची  मजा न्यारीच. झील चंदिगढ मधील आणखी एक प्रेक्षणीय स्थान, येथे आम्ही कुलचा व हंडी के छोलेची चव घेतली. चंदिगढ मधील रस्ते रुंद लांबच लांब व स्वछ आहेत रस्त्यांच्या दोहो बाजूस भरपूर रुंद फुटपाथ, ते ही हिरवळीने सजलेले, त्यामागे स्वतंत्र घरे, प्रत्येक घरा समोर छोटी गार्डन, सगळेच खूप आल्हाद दायक आहें. ह्याला मिनी अमेरिका म्हणतात ते उगीच नाही.
                                                        चंदिगढ शहरातील सुंदर रस्ता
                                           रोज गार्डन मधील गुलाब
                                   सुरेश झाडामागून कुणाशी नजर मिळवतोय
चंदिगढ शिमला मार्गावर कालका जिल्ह्यातील परवाणु हे ठिकाण, हे आमचे पुढील  नवलाईचे केंद्र होते, टिंबर ट्रेल हे येथील मेन आकर्षण पांच हजार दोनशे फुटावर जाणारा हा भारतातील सगळ्यात लांब रोप वे आहें. १५ सीटरची, लाल रंगाची आकर्षक व सुंदर गाडी    दर्या खोर्यान वरून  हळू हळू वर जाते, काचेच्या केबिन मधून दिसणारे दृश्य म्हणजे डोळ्याना मेजवानी. एव्हढ्या उंचीवर, लान टेनिस, मुलांसाठी खेळण्याची विविध साधने, आधुनिक रहाण्याची सोय असलेले हॉटेल, अदबीने बोलणारे वेटर, हॉटेल स्टाफ सगळे कसे हटके आहें. ज्याच्या पाशी वेळ पैसा व ते खर्च करण्याची इच्छा असेल त्याने येथे येवून निवांत आठवडाभर राहावे, दिल खुश होईल. आम्ही २१० रुपयात ३ कप चहा घेण्याचे धाडस करून परतलो. एक आगळाच अनुभव होता.
                                            परवाणु येथील टिंबर ट्रेल
                                                टिंबर ट्रेल मध्ये  प्रवासी
                                त्रैलच्या केबिन मधून दिसणारा नेत्रदीपक नजारा
तो दिवस होळीचा होता, होळी आणि पंजाब क्या बात, पंजाब्यांनी आमच्यावर गुलाल फेकून आमची पण होळी साजरी केली, येताना एका भव्य  धाब्यावर जेवणास थांबलो, रंगात रंगलेले युवक युवती लहान मुले  ह्यांनी धाब्यावर गर्दी केली होती ,पण जेवणास उशीर झाला नाही.

"धर्म क्षेत्रे कुरु क्षेत्रे समवेता युयुत्सव:  मामका: पाण्डवाश्चैव  किमकुर्वत  संजय" 
 २१ दिवस सतत यूद्ध झालेली पांडव कौरवांची यूद्ध भूमी कुरुक्षेत्र, मी नऊ वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाहिली होती, मला कारण माहित नाही, पण मला हे स्थान खूप आवडले. 

कौरवपीता धृतराष्ट नेत्रहीन असल्याने त्याना युद्धात भाग घेणे अश्यक कोटीचे होतेच, पण त्याना ते बघणेही शक्य नव्हते. म्हणून ते संजयला विचारतात कि ,  हे संजय माझे पुत्र आणि पांडू पुत्र, कुरुक्षेत्र ह्या धर्म क्षेत्रात युद्ध करण्यास उतरले आहेत, तरी तेथे काय काय  घडतय ते तू  मला सांग. त्यानुसार संजय  त्याना क्षणा क्षणाचे विवरण देत होता. ह्या वरून एक गोष्ट प्रकाशात येते ती म्हणजे, कौमेंट्री हा प्रकार फार प्राचीन आहें,  व त्याची सुरुवात आपल्या   देशातच सुरु झाली असावी, आपल्या शंभर पुत्रांच्या मरणाचे वर्णन ऐकणे, केव्हढे दु:खदायक,
कल्पनेनेच अंगावर शहारे येतात.        

रणांगणावर दोन्ही फळ्यानमध्ये आपले गुरु,बांधव,आप्तेष्ट पाहून, अर्जुन लढण्यास कचरला तेव्हा भगवान श्री कृष्णाने त्याला जो  उपदेश दिला,तो भगवत गीतेच्या रुपात जाणला जातो, पण  त्याचे अगदी संक्षिप्त सार म्हणजे :

"कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन I        
 मा कर्मफलहेतुर्भूर मा ते संगोSस्त्वकर्माणि  "     

 श्री कृष्ण  सांगतात कि, हे पार्थ तुझे कर्तव्य पार पाडण्याचा  तुला पूर्ण अधीकार  आहे , किंबहुना तुला ते कर्म पार पाडावयास पाहिजेच , फक्त  कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता. तसेच तुझ्या   कर्मातून जे निष्पन्न होईल, त्यासाठी तू स्वता:ला कदापि कारणीभूत समजू नकोस. ह्या दोन ओळीत द्यानाचे  भंडार आहे जे समजण्या एव्हढी आमची पात्रता नाही. कुरुक्षेत्री ह्या ठिकाणी एका  वटवृक्षा खाली  श्री कृष्णाने सारथ्य केलेला रथ, अर्जुन व श्रीकृष्ण ह्यांचे काचेच्या पेटीतील मुर्ती रूप  आपल्याला त्या काळात घेऊन जाते , सर्वच दु:ख दायक, कौरव येथे पराभूत झाले, किती योध्ये  कामास आले, युद्धा नंतर श्रीकृष्ण द्वारकेस गेले व तेथूनच निजधामास,          पांडव द्रौपदीसह बद्री मार्गे स्वर्गात गेले, त्यामुळे येथे कारुण्य भासते.  महाभारत हा एक सूडाचा प्रवास होता, व कोणत्याही सूडाचा शेवट कारुण्यास्पदच असतो.  ह्या विषयावर मी बरेच कांही लिहू शकतो पण मी महाभारत विषयावर लिहित नसून, यात्रा निमित्त कुरुक्षेत्री आलो, व ओघाने प्रवास वर्णनात कांही किस्से नमूद करत आहे हे न विसरता, कलमेस रोक देतो.
                                    कुरुक्षेत्र श्री कृष्ण मंदिराचे प्रवेश स्थान             
                                        पार्श्व भूमीत गीतोपदेशाचे स्थळ
                                               विचारात तल्लीन पंडित 
                                           ब्रम्हकुंडा वर सुरेश सोबत श्वेता
 कुरुक्षेत्र युनिवर्सिटी , श्रीकृष्णद्वार, कर्णद्वार , अर्जुन्द्वार हे फलक पाहून मला
प्रोफेसराच्या जागी भीष्म पितामाः, व विद्यार्थ्यांच्या जागी पुस्तका ऐवजी धनुष्य बाण घेवून  युनिवर्सिटीत कौरव व पांडव प्रवेश करत असल्याचा भास झाला, एखाद्याला ही अतिशययोक्ती वाटेल, पण माणसाची  एखाद्या बाबतीत तल्लीनतेने तंद्री लागली  तर तो अशी दृश्ये visualise करू शकतो, असा माझा अनुभव आहें . शल्याच्या शय्येवर वर झोपलेले भीष्म व जमिनीत बाण मारून अर्जुनाने त्यांच्या करीता त्यांच्या तोंडात जाणारी गंगा निर्माण केल्याचे मूर्ती रुपात येथे बघण्यास मिळते, तसेच पन्नास  फुटी हनुमान प्रवेशद्वारात रक्षक म्हणून असल्याचे आढळते.  ब्रम्ह कुण्ड हे पुढचे  आकर्षणिय  स्थान,     एक लाख मनुष्य एका वेळी स्नान करू शकतील येव्हढे प्रचंड मोठे हे कुण्ड, तलाव अथवा सरोवर आहें. तलावाच्या बाजूला मोठ्या ओसर्या आहेत जेथे हज्जारो साधू सन्यासी  विश्रांती घेतात, अमावास्येला ह्या कुण्ड स्नानाचे विशेष महत्व असल्याचे सांगण्यात येते.  तलावाच्या मध्यात  महादेवाचे मंदिर आहें. ह्या आधी हे सर्व आम्ही पाहिले असल्याने आम्ही गाडीतच बसलो, बाकी मंडळी कुंडाकडे ,    ' कालें घोडेकी नाल का छल्ला' शानिदोष  निवारण के लिये असा फलक समोरच्या दुकानात दिसला, जीतुला पाठवून मी एक छल्ला  मागवला , पाठोपाठ विद्याने पण.  माणूस किती आधुनिक वागला, शिकला सवरला, तरी अंधविश्वासा  वरचा त्याचा विश्वास सुटत नाही ,अवघ्या पन्नास  रुपयात शनी दोष निवारण स्वस्त होते नाही का ? कुण्ड पाहून ग्यांग परत आली, गरम चहा घेवून सगळे गाडीत बसले, व संध्याकाळी साडे पाचला  ला कुरुक्षेत्र सोडले. अमोद केतकर, माझ्या चुलत बहिणीचा नवरा ह्याच्याशी फरीदाबादाला फोन वर काकांचे बोलणे झाले, आम्ही रात्रीच्या मुक्कामास तेथे जाणार होतो, त्याच्या मते आम्हाला पोहचण्यास रात्रीचे ११ वाजले असते जीतुला पण तसेच वाटत होते म्हणून खरे तर तो कुरुक्षेत्र कडे वळण्यास तयार नव्हता.   पण रस्ता मस्का होता, शिवाय होळीची सुट्टी असल्याने रहदारी अजिबात नव्हती , त्यामुळे आपण नऊ पर्यंत पोंचू असा माझा कयास होता, म्हणून मी कुरुक्षेत्राचा अट्टाहास केला,  योगा योग असेल पण आम्ही  डॉट नऊला  फरीदाबाद गाठले, केतकराना नवल वाटले , माझा कयास खरा ठरला, गेल्या वर्षभरातील अनुभव कोठे तरी कामास आला.

केतकर पाहुणचार ह्याच्यावर एक निम्बंध नाही तर प्रबंध लिहिता येईल, अगत्य इतके सुंदर व निस्वार्थी असू शकते ह्याची प्रचीती एकदा नाही तर दोनदा आली, ती कशी हे शेवटी. दुसरे दिवशी दिल्लीहून आमची काठमांडूची फ्लाईट होती, सर्वांनी फक्त एक एक कॅबीन ब्याग बरोबर घेवून, बाकी सगळे सामान केतकरांच्या घरी एका रूम मध्ये डम्प केले व दिल्ली विमान तळाकडे धाव घेतली.
                                         संध्या  व आमोद केतकर आमचे होस्ट , फरीदाबाद

सोमवार, २ एप्रिल, २०१२

मा का बुलावा - कटरा, डलहौसी, धरमशाला

                                                  टीमचे हसते चेहरे  
राजधानी दिल्लीला,  शिवगंगेचे  सकाळी ७.४० हे शेडूल टाईम असल्याने आम्ही सगळे लवकर उठून सात  पर्यंत तयार झालो, पण अजून अलिगढ सुद्द्धा आले नव्हते, गाडी तब्बल पांच तास लेट होती, मार्गात कोठेतरी कांहीतरी अघटीत झाल्याने ही दिरंगाई.     शी.........., नेमकी आपली गाडी लेट, काय करायचे, आता कसे वगैरे अनर्थक बोलण्याशिवाय आमच्या हातात कांही नव्हते .' भूक नाही, पण शिदोरी असावी ' म्हणतात, त्या नुसार आमच्या कडे बरेच खाद्य पदार्थ असल्याने नाश्त्याची पंचाईत झाली नाही हे खरे. साधारण दुपारी १.३० ला दिल्ली गाठली, V I P पार्किंग मध्ये आमची नेहमीची टेम्पो जितु (वाहन चालक) सोबत आमची वाट पहात होती. प्रत्येकाने आपापल्या सीटचा ताबा घेतला, गाडीने कत्राच्या दिशेने धाव घेतली.

गाडीने कितीही गती घेतली तरी, कमीतकमी १२ तास कत्राला जाण्यास लागणार होते, शिवाय जेवणासाठी एखादा तास , म्हणजे रात्र भराचा  प्रवास आवश्यक होता, प्रयाणास सुरुवात केली, सोनीपत, पानिपत करत, एक धाबा गाठला, धाबा बर्यापैकी होता, पण जेवण मात्र अंकुश चौधरी, I mean "झकास". गणेश व श्वेता सोडून सगळे वयस्क होते, पण सगळ्या सिनिअरचा उत्साह दांडगा होता, कोणाची कोणतीही तक्रार नाही, गाडी लेट झाली ह्यात कोणाचा दोष, प्रवासात हे असे कधी तरी  होणारच, किती समजुतदारपणा कौतुकास्पद होते. जालंधर, पठाणकोट पंजाबातील शहरे मागे पडत होती, रात्र दाट होत होती, जितु सोबत जागणे भाग होते, झोपाळू गणेशला झोप आवरत नव्हती, बाकी बहुतेक सगळे जागे होते, मार्ग छान होता. पठाणकोट च्या थोडे पुढे आल्यावर जीतुच्या अंगात पासवान शिरला, कोठेतरी बायपास घेतला  त्याचा बायपास आम्हाला भारी पडत होता, जीतुशी जास्त वग असल्याने फारसे बोलता येत नव्हते,  तरी मी त्याला विचारले कि बायपास का, तेव्हा तो म्हणाला कि, तुम्ही कोणत्याही गाडीने आला असतात तरी, तुम्हाला ह्याच मार्गाने जावे लागले असते, कारण मेन रोडचे रस्ता दुरुस्तीकरण चालू आहें. उत्तर समाधान कारक होते, पुन्हा चांगला रस्ता लागला, हायसे वाटले, पण पावसाला आमची सोबत द्यावी वाटली, सकाळी  सहाला  जम्मू गाठले , अजून ५० कि. मी. घाट रोड बाकी होता, पाउस जारीच होता, हवामान असेच राहिले तर, हेलीकॉप्टर उड्डाण घेईल का नाही अशी शंकेची पाल मनात चुकचुकली, कसेही असो, कत्राला तर पोहनचणे जरुरी होते, सकाळी ८.३० ला होटल मा वर रिपोर्ट केले. आमचे आरक्षण,  खरे तर  आदल्या दिवशीचे होते, पण कोणत्याही प्रकारची समस्या न निर्माण करता होटल मालकाने आम्हाला रुम्सचा ताबा दिला. 
                                      हेलीप्याडला जाण्यास सज्ज टीम
आम्ही सगळे पटकन तयार झालो, १२ वाजता आम्हाला हेलीप्याडवर रिपोर्टिंग होते. सुर्यनारायण आमच्यावर प्रसन्न होते, आकाश निरभ्र झाले , ठराविक वेळेस हेलीकॉप्टरने उड्डाण घेतली, नवीन व आगळाच अनुभव होता, अवघ्या पांच  मिनिटात आम्ही १२००० फुट उंच  सांझीचत हेलीपॅड वर उतरलो, येथून माता वैष्णोदेविचे मंदिर अडीच  कि.मी. अंतरावर होते. डोल्या, घोड्या ह्या सज्ज होत्या, श्वेता व गणेश पायी  आले, बाकी  कोणी डोली, तर कोणी घोडी हे साधन मार्ग क्रमणासाठी निवडले.
                                         पालकीत विराजमान विद्या
                                        श्वेता, माता वैष्णोदेवीच्या मार्गावर
                            "अभी तो मै जवान हुं" सुरेश व काकू पोनीवर सवार
मार्ग स्वछ , नीट बांधलेले, आहेत, जाताना दिसणारी दृश्य नयन मनोहर. येव्हढ्या उंचीवर माध्यमिक शाळा होती, स्टाफ ला राहण्यासाठी पक्की घरे पाहून नवल वाटले.   येथील डोली खूपcomfortabale एखाद्या सिम्हासानावर बसल्या प्रमाणे भासत होते,' जय माता दी ' च्या घोषात मंदिराच्या प्रवेश द्वारा पाशी आलो, मा चा  बुलावा आला होता, आणि तो ही अगत्याचा. दर्शन खूप व्यवस्थित झाले, पुजार्याने त्या पवित्र स्थाना विषयी थोडक्यात माहिती दिली, माथा टेकावयास सांगितले, प्रसाद दिला, प्रसन्न मनाने आम्ही परतीच्या मार्गास आपापल्या डोलीत/घोडीवर विराजमान झालो, पुन्हा सांझीचत ते कटरा अवघ्या पाच मिनिटात परत. माता वैष्णोदेवीच्या दर्शनाचे उद्दिष्ट साध्य झाले होते, आता तेथून चेक औट करणे आवश्यक होते, कारण दुसर्या दिवशी मंगळवार होता, एखाद्या बाईच्या डोक्यात जरी देवीच्या वारी देवीचे स्थान  सोडणे शुभ नाही अशी शंका आली असती तर कठीण होते.
                                  हेलीकॅप मधून माता वैष्णोदेवी मार्गाचे दृश्य
                                              १२००० फुटावरील इमारती
आम्ही संध्याकाळी जम्मूचा मार्ग सिधाराला, वेळ वाचवण्याच्या दृष्टीने  रात्री ९ पर्यंत होईल तेव्हढे अंतर पुढे जावे असे ठरले, साधारण साठ कि. मी. गेल्यावर जम्मू जिल्ह्यातील कालाकुचा ह्या ठिकाणी पोटपुजे करीता एक बर्यापैकी स्थान आढळले, बाजूला एक म्यारेज हौल होता, सहज सुचले म्हणून चवकशी केली, तर तेथे माफक दरांत रहाण्याची उत्तम सोय असल्याचे कळले, मग काय ठरले    इथेच  टाका तंबू !!!!

एकेका रूम मध्ये दोन दोन चार चार प्रशस्त बेडस होते.   पुढील थांबा डलहौसी फार दूर नव्हता त्यामुळे सगळ्यांनी भरपूर आराम केला व  दुसरे दिवशी सकाळी न्याहारी करून निवांत डलहौसी कडे निघालो. 
                                                    कालाकुचा येथे जेवणाच्या टेबलावर
                             चहा पीत पीत जितु सोबत पुढील प्रयाणाची योजना
पठाणकोटचे अलीकडेच ऐक वळण डलहौसी कडे वळते, येथून हिमाचल प्रदेश सुरु होतो, एच . पी.  मधील बहुतेक पुरुष लाल गोरे, उभ्या चेहर्याचे, धारदार सरळ नाकाचे, थंडीपासून संरक्षणा  करीता स्वेटर, जाकेट किंवा कोट घातलेले, व हलकीशी दाढी वाढवलेले  शीडशिडीत  बांध्याचे व सुंदर आहेत,  मुली  जरा गोल मटोल बर्याचश्या प्रीती झिनटा सारख्या आढळल्या. शाळा कालेजाचे युनिफार्म्स पांढरी प्यांट, टक इन पूर्ण बाह्यांचा शर्ट व वरून लाल कोट. 

घाट रोड चढत डोळ्याने सृष्टी सौंदर्य टिपत, डलहौसी च्या  सुभाष चौकात आलो. गेल्या वर्षी बर्याच हिमालयीन प्रवासामुळे घाटरोड, नैसर्गिक सौंदर्य  एव्हढी सरावाची झाली होती कि अनुक्रमे  त्याची भीती किंवा कुतूहल जरी राहिले नव्हते, तरी त्याचा आनंद लुटावा वाटत होता.
                                                डलहौसी च्या मार्गावर
 महाबळेश्वर,  शिमला  रानीखेत, नैनिताल  सारखे डलहौसी हे एक हिल स्टेशन आहें, लॉर्ड डलहौसी ह्याने हे  थंड हवेचे स्थान हिल स्टेशन म्हणून  डेव्हलप केले. येथील सुभाष चौक म्हणजे शिमला येथील माल रोडवर असलेल्या इंदिरा गांधी चौका सारखे आहें. नेतांजीच्या पुतळ्या मागे, बर्फाने आच्छादित हिमालयाची उत्तुंग शिखरे  मध्ये धुक्याची चादर, पटकन ते दृश्य क्यामेर्यात बंदिस्त केले.
               अमिताभ-धर्मेंद्र ये दोस्ती हम नही तोडेंगे नेताजींच्या साक्षीने,  डलहौसी
                                          कुडकुडत्या थंडीत श्वेता व काकू

                                      डोंगराला सुरुंग लावल्या कारण थांबा
समोरच १०० वर्षे जुने लाकडी बांधणीचे एक हॉटेल होते, तेथे आम्ही जेवणासाठी शिरलो, गरम बासमती तांदुळाचा भात, व पिली दाल खाल्ली , वर गरम चहा घेतला, व बाहेर       पडलो. थंडी कडाक्याची होती, खरे तर "ओक  व्याली रिसोर्ट" मध्ये एक दिवस रहाण्याचा आमचा प्लान होता, पण थंडीमुळे कोठे बाहेर पडणे अश्यक होते, म्हणून रहाण्याचा बेत रद्द करून परतीच्या मार्गास लागलो. थोड्या अंतरा नंतर आमच्या गाडीचे एक  चाक पंक्चर झाले, घाटात, कडाक्याच्या थंडीत, सर्व प्रवाश्याना गाडीतून खाली उतरावे लागले, अर्थात आम्हा उभयताना exemption होते, ओरिजिनल चाकाची जागा स्टेपनीने   घेतली. गाडी पुन्हा सुरु, अजून एक फर्लांग पुढे ,गेलो तो गाडीला पुन्हा थांबावे लागले, समोर डोंगराला सुरुंग लावण्याचे काम चालले होते. आम्ही थांबलो तेथे चहाची एक टपरी होती, आम्ही गरम चहा घेतला तोवर मार्ग मोकळा झाला आणि आम्ही धरमाशालेच्या रस्त्यास लागलो.

धरमशाला दलाई लामाचे स्थान बघण्याची उत्सुकता होती, रस्ता दुरुस्तीचे काम चालू असल्याने, गाडी धीमे चालली होती, थंडीमुळे, निसर्गाच्या हाके साठी सुद्द्धा गाडीबाहेर पडणे जीवावर येत होते, चौ मौ करण्या साठी कांहीतरी हवे होते, तसल्या निर्मनुष्य रस्त्यावर अंधार्या रात्रीत आम्हाला लेहरचे पोट्याटो चिप्स एका छोट्या दुकानात मिळाले, पाणी प्यायला आधार झाला. रात्री साधारण नऊ चे सुमारास धरमशाला हद्द सुरु झाली," मिडवे रिसोर्ट" ह्या सुरुवातीच्या रिसोर्ट मध्ये आम्ही रात्रीचा सहारा घेतला.
                                                     मिडवे रिसोर्ट
अनुपम बांगडीया ह्या म्यानेजरने हसत मुखाने आमचे स्वागत केले, चविष्ट जेवण देऊ केले. रिसोर्ट च्या मागे सुंदर डोंगर व त्यातून वहाणारे निर्मल स्वछ झरे पहात झोपेच्या आधीन झालो. सकाळी चेक औट केले, त्या आधी अनुपम कडून येथील प्रेक्षणीय स्थलांबद्दल माहिती गोळा केली. सर्व प्रथम  लामाचे भव्य बौद्ध मंदिर बघण्यास गेलो, हजारो तिबेटींअनस त्यांच्या बौद्ध धर्मीय लाल रंगाच्या टिपिकल वेशात वावरताना दिसले. मंदिराच्या प्रवेशद्वारात बायका गरम गरम उकडीचे मोदक (भाज्यांचे सारण असलेले) आणि त्यासोबत लाल मिरच्यांचा ठेचा विकत होत्या, कदाचित हे थंडीला मारक असावेत ह्याला तेथे 'मोमो' म्हणतात, पोटभर नाश्ता झाला होता, तरी लालची जिभेच्या  चोचल्या साठी  थोडे मोमो आम्ही घेतलेच. मुख्य मंदिराला बर्याच पायर्या व चढ उतार असल्याने साठे व विद्या खाली उतरले नाहीत, खरे तर त्या जागी गाडी पार्क करणे नियमाच्या विरुद्ध आहें, तरी दिलदार हवालदाराने आमची गाडी तेथे उभी करण्याची परवानगी दिली, कृतज्ञता म्हणून आम्ही कांही पैसे त्याला देऊ केले पण ते त्याने घेतले नाही, हे विशेष वाटले.
मंदिरात  बुदद्धाची सोन्याची सुंदर मूर्ती आहें, प्रसाद रुपात येथे बिस्किटाचे पुडे देतात.
                                          दलाई लामा मंदिराचे आवार
                                               मिडवे मध्ये दुपारचे जेवण
आवारात आकर्षक वस्तूंची दुकाने आहेत. परतीच्या मार्ग म्हणजे उतार , चढाव व खतरनाक वळणांचा, कांही जागी प्रवाश्याना खाली उतरावे लागते पण मजा वाटते, येथिल कृत्रिम तलाव व नुकतेच बांधलेले क्रिकेट स्टेडीअम पाहून, दुपारचे जेवण उरकून, धरमशालेला सलाम ठोकला व चंदिगढ द वेल  प्लानड सिटी च्या दिशेस प्रस्थान केले.  

हिमाचल प्रदेशात रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार शेते, ह्यांचे स्वरूप शेती पेक्षा परसातील बागे सारखे वाटते, शेतात असलेली घरे झोपडी सारखी नाहीत तर टुमदार पक्क्या बांधणीची आहेत, मार्गावर दिसणार्या बर्याच शाळा पाहून येथे शिक्षणाचे महत्व असावे असे वाटले , रस्त्याने तुरळक असली तरी रहदारी आहें प्रवास करताना हे सगळे बघून प्रवास बोर वाटत नाही. धरमशाला ते चंदिगढ पहिले तीस चाळीस कि. मी. रस्ता दुरुस्तीचे सोडल्यास मार्ग चांगला आहें.  
                                                  बर्फाच्छादित हिमालय
आमच्या प्रयाणाचा  दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता, हा गुरु गोविंद सिंग ह्यांचा जन्म दिवस. आनंद साहिब हे शीख लोकांचे मोठे गुरुद्वार ह्या मार्गावर आहें. रस्त्यात हज्जारो सरदारजी आपल्या बिब्बे, चायजी, पाजी,कौर व पुत्तर बरोबर निरनिराळ्या वाहनातून जाताना दिसले, आनंद साहिब जसे जसे जवळ येत होते, तशी तशी ही गर्दी वाहनांसाठी गतिरोधक बनत होती , गाड्या गोगल  गायीच्या गतीने पुढे सरपटत होत्या, पण हे सर्व सुसह्य होते, बाधक वाटले नाही, पुढल्या स्थानकाला पोहन्चन्यास उशीर झाला एव्हढेच. जागोजागी  लंगर उपलब्ध होते, मला त्याचा लाभ घेण्याची तीव्र इच्छा झाली, पण ते गर्दीमुळे अश्यक होते. देशातले नसतील , पण मला वाटते पंजाब मधील सर्व सरदारजी आपल्या परिवारा सोबत तेथे उपस्थितीत होते, येव्हढे शीख लोकं एकदम मी अम्रीत्सरला  पण पाहिले नव्हते. ही जमात सगळ्यावर मनापासून प्रेम करतात मग तो देश, धर्म, मैत्री, इश्क़ नाहीतर परिवार कांही असो, मनोमन ह्या पंथाचे कौतुक केले, गुरु गोविंद साहिबाना प्रणाम केला, व वाट मिळेल  तसे पुढे जात राहिलो. सन व्ह्यू चंदिगढ, ह्या सेक्टर १२ मधील आधुनिक  हॉटेल वर रात्र गुजारली.